महांकाली सहकारी साखर कारखाना राजारामबापू कारखान्याकडे

दिगंबर शिंदे

parbhani shiv sena ubt district Chief Vishal Kadam is joining eknath shindes shiv sena
मुहूर्त ठरला ! उबाठा शिवसेनेच्या परभणी जिल्हाप्रमुखांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गुरुवारी प्रवेश
karjat loksatta news
कर्जत : व्यापाऱ्यावर चुकीच्या कारवाईच्या निषेधार्थ बाजार समितीचे…
Cm Devendra Fadnavis Statement About Suresh Dhas
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सुरेश धस आधुनिक भगीरथ एकदा मागे लागले की डोकं खाऊन….”
mirkarwada port loksatta news
मिरकरवाडा बंदराचा विकास वादाच्या भोवऱ्यात, राजिवडा महिला मच्छीमार तालुका सहकारी संस्थेची २० लाखांच्या नुकसान भरपाईची नोटीस
Udayanraje Bhosale angry on actor rahul solapurkar
“… त्याला गोळ्या घातल्या पाहिजेत”, राहुल सोलापूरकरच्या विधानावार खासदार उदयनराजे भोसलेंची संतप्त प्रतिक्रिया
Solapur leopard death loksatta news
Solapur Leopard Attack : वेळापूरजवळ वाहनांची धडक बसून बिबट्याचा मृत्यू; जखमी अवस्थेत दोघांवर केला हल्ला
raigad district land deals
रायगड जिल्ह्यात जागा जमिनींचे व्यवहार जोमात, नऊ महिन्यांत पावणे तीन हजार कोटींचा महसूल जमा
Turmeric price in Sangli is Rs 21 thousand per quintal
सांगलीत हळदीला क्विंटलला २१ हजारांचा दर
Will return both maces Chandrahar Patils stance in protest against umpire
दोन्ही गदा परत करणार! पंचाच्या निषेधार्थ चंद्रहार पाटलांची भूमिका

सांगली : पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखानदारीमध्ये  प्रबळ असलेल्या इस्लामपूरच्या राजारामबापू सहकारी साखर कारखान्याने जिल्ह्यात महांकाली सहकारी साखर कारखाना २५  वर्षांसाठी चालविण्यास घेण्याचा निर्णय घेतला. कारखान्याच्या वार्षिक सभेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनीच तशी घोषणा केली आहे. जिल्ह्यातील सुमारे ४० टक्के उस गाळप करण्याची क्षमता राजारामबापू कारखान्याकडे यापुढील काळात असणार असून जिल्ह्याच्या आर्थिक नाडय़ा आता इस्लामपूरच्या हाती राहण्याची चिन्हे आहेत.

 पलूस-कडेगाव वगळता अन्य सर्वच तालुक्यांतील साखर कारखानदारीची धोरणे आणि दिशा आता इस्लामपूरकरांच्या हाती एकवटली तर आश्चर्य वाटणार नाही अशी स्थिती आहे. सांगली जिल्ह्याचे गेल्या अर्धशतकाहून अधिक  काळ अर्थकारण कृष्णाकाठच्या ऊस पट्टय़ातच फिरत आले आहे. बारमाही वाहणाऱ्या कृष्णा-वारणा नदींच्या खोऱ्यात असलेल्या पाण्यामुळे आणि जलसिंचनाचे जाळे असलेल्या या भागातील ऊस शेतीने आर्थिक स्थैर्य दिले. मात्र, या पश्चिम भागातील सधनतेवर मिरज, तासगाव, विटा, जत, कवठेमहांकाळ आणि आटपाडी या दुष्काळी भागातही राजकीय सोयीतून साखर कारखानदारी सहकाराच्या माध्यमातून उभारली. यातील मिरजेचा मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना राजारामबापूच्या पाठबळावर तग धरून राहिला. अन्य साखर कारखाने आर्थिक संकटात सापडत गेले.

Story img Loader