सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातून जाणा-या नागपूर-गोवा शक्तिपीठ राष्ट्रीय महामार्गासाठी जमिनी देण्यास शेतक-यांचा विरोध असताना दुसरीकडे सुरत-चेन्नई हरित राष्ट्रीय महामार्गासाठी जमिनी देण्यासही बहुसंख्य शेतक-यांचा विरोध कायम आहे. सुरत-चेन्नई हरित महामार्गासाठी जमिनी बाधित होणा-या शेतक-यांचे आंदोलन उभारण्यासाठी येत्या रविवारी,७ जुलै रोजी सोलापुरात शेतकरी परिषद होणार आहे. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात माकपचे नेते नरसय्या आडम यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या शेतकरी परिषदेस काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे व कामगार सेनेचे नेते रघुनाथराव कुचिक आदी उपस्थित राहणार आहेत. परिषदेचे संयोजक महारूद्र जाधव यांनी याबाबतची माहिती दिली. या परिषदेस सुमारे २५० बाधित शेतकरी उपस्थित राहण्याची अपेक्षा असल्याचे जाधव यांनी सांगितले.

हेही वाचा >>> ठाकरे गटाच्या आमदाराचं देवेंद्र फडणवीसांकडून तोंडभरुन कौतुक; सभागृहात नेमकं काय घडलं?

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray Anil Parab
“उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सेनापती…”, फडणवीसांकडून ठाकरे गटाच्या आमदाराचं तोंडभरुन कौतुक
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
pankaja munde manoj jarange
पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेच्या उमेदवारीला मनोज जरांगेंचा विरोध? सूचक वक्तव्य करत म्हणाले…
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
rumor, Vishal Agarwal absconding, pimpri chinchwad police, porsche car accident
विशाल अगरवाल पोलिसांच्या ताब्यातून फरार? पिंपरी चिंचवड पोलिसांनी केला खूलासा…

सुरत-चेन्नई हरित राष्ट्रीय महामार्ग सोलापूर जिल्ह्यातून बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातून जाणार आहे. त्याची या चारही तालुक्यातील लांबी १५१ किलोमीटर असून त्यासाठी ६१ गावांतील जमिनी संपादित केल्या जात आहेत. यात ६७८ प्रकरणांमध्ये ५३४ कोटींचा निधी मोबदला म्हणून देण्यासाठी प्राप्त झाला आहे. त्यापैकी २९५ कोटींचा मोबदला बाधित शेतक-यांना अदा झाला आहे. मात्र बहुसंख्य शेतक-यांनी जमिनी द्यायला विरोध दर्शविला आहे. विशेषतः अक्कलकोट तालुक्यातील सर्व बाधित १७ गावांच्या शेतक-यांचा जमिनी देण्यास तीव्र विरोध आहे. नागपूर-गोवा शक्तिपीठ राष्ट्रीय महामार्गासाठी सोलापूर जिल्ह्यातील बाधित शेतक-यांनी विरोध दर्शविला आहे. या प्रश्नावर अलिकडेच मोहोळ येथे शेकापचे नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत बाधित शेतक-यांचा मेळावा झाला होता.