मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकार मराठा समाजाबरोबर असल्याचं म्हटलं. तसेच मराठा आरक्षणासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करत असल्याचं नमूद केलं. मुख्यमंत्री शिंदेंनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकारला वेळ द्यावा लागेल, असं म्हटलं. याबाबत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते सोमवारी (११ सप्टेंबर) जालन्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते. त्याचा उपोषणाचा १४ वा दिवस आहे.

मनोज जरांगे म्हणाले, “जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समजावून सांगावं लागेल म्हणत असतील, तर ते यातील आणि आम्हाला समजावून सांगतील. ते त्यांचं काम आहे. आम्ही त्यांना कुठं म्हटलं की, समजावून सांगायला येऊ नका. त्यांचं ऐकणं आमचं काम आहे. बघू, ते काय समजावून सांगतात.”

Congress State President MLA Nana Patole Nana Patole criticizes BJP over the incident of communal tension
‘‘राजकीय फायद्यासाठी हिंदू, मुस्लीम…’ नाना पटोलेंची भाजपवर टीका
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Like British Congress only thoughts of looting country modi criticism in phohadevi washim
काँग्रेस इंग्रजांप्रमाणेच देशाला लुटण्याचा विचार करते….बंजारा समाजाविषयी सदैव अपमानजक….पोहरादेवीत पंतप्रधानांचा घणाघात….
Narendra Modi statement that the people of Kashmir are waiting for a terror free government print politics news
काश्मिरी जनतेला दहशतवादमुक्त सरकारची प्रतीक्षा – मोदी
yuvasena s dipesh mhatre
कडोंमपाच्या नाममुद्रेचा दिपेश म्हात्रेंनी गैरवापर केल्याची भाजपची आयुक्त डॉ. जाखड यांच्याकडे तक्रार; कायदेशीर कारवाईची मागणी
kailash gahlot Hanuman statement
आपचं रामायण : आता कैलाश गेहलोत म्हणतात, “मी केजरीवालांचा हनुमान”
Controversy over ministership in Shiv Sena
शिवसेनेतील मंत्रिपदाची रस्सीखेच चव्हाट्यावर
arvind sawant replied to chandrasekhar bawankule
“उद्धव ठाकरेंना मविआतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे” म्हणणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळेंना ठाकरे गटाचे प्रत्युत्तर; म्हणाले…

“आमचं काही द्यायचं म्हटलं की वेळ लागतो, बाकीच्यांना…”

आरक्षणाला वेळ लागेल, तुम्ही ऐकत का नाही? असा प्रश्न विचारला जात असल्याबाबत पत्रकारांनी विचारलं. त्यावर मनोज जरांगे म्हणाले, “७५ वर्षे झाली आम्ही वेळ द्या हेच ऐकत आहोत. इतकी वर्षे तेच चालू आहे. आमचं काही द्यायचं म्हटलं की वेळ लागतो. बाकीच्यांना काही द्यायचं म्हटलं की, वेळच लागत नाही.”

हेही वाचा : “पश्चिम महाराष्ट्राने तुमचं काय घोडं मारलं?”; पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर मनोज जरांगे संतापले

“आम्हाला आरक्षण द्यायची वेळ आली, तर वेळ द्या म्हणत आहेत”

“कितीतरी जाती एका रात्रीत ओबीसी आरक्षणात घातल्या आहेत. तेव्हा यांना वेळ लागला नाही. तेव्हा आम्ही सरकारला विचारलंही नाही की, इतरांचा ओबीसीत समावेश का केला. आता आम्हाला आरक्षण द्यायची वेळ आली, तर वेळ द्या म्हणत आहेत. अजित पवार म्हणतात त्यांना समजावून सांगावं लागेल. माझी तयारी आहे. ते काय समजावून सांगतात सांगा,” असंही मनोज जरांगेंनी नमूद केलं.