राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काल (दि. ३ फेब्रुवारी) अहमदनगरमधील ओबीसी एल्गार मेळाव्यात भाषण करत असताना १६ नोव्हेंबर रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याचा खुलासा केला. तसेच मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याला त्यांनी विरोध केला. तसेच कोल्हापूरमधील नाभिक समाजाच्या एका तरूणाबरोबर झालेल्या घटनेचा उल्लेख करून त्यांनी नाभिक समाजाला मराठा समाजावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. या आवाहननंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे.

“मराठा आणि ओबीसी समाजांत भेदभाव…”, भुजबळांचा फडणवीसांना इशारा; म्हणाले, “तुमचा गृहविभाग…”

jayant patil Sarcastic speech to rular party on last day of Winter session of the legislature
एक मुख्यमंत्रीही काफी है! इतरांची गरज नाही, जयंत पाटलांची टोलेबाजी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
ajit pawar visit massajog
शरद पवारांपाठोपाठ आता अजित पवारही मस्साजोगला भेट देणार
nana patole Challenge to devendra fadnavis to declare names of active urban Naxal organizations and their leaders in Bharat Jodo campaign
‘भारत जोडोत’ सक्रिय शहरी नक्षल संघटनांची नावे द्या, मुख्यमंत्र्यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे पत्र
Congress protest against BJP , Congress Mumbai office attack , Congress Nagpur protest ,
कॉंग्रेस कार्यालयावरील हल्ला, मविआचे आंदोलन; म्हणाले “महायुतीची महागुंडशाही…”
Sanjay Shirsat on Sharad Pawar
Sharad Pawar : “जेव्हा ते शांत असतात तेव्हा समजून जायचं की…”; शरद पवारांबद्दल शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा
Rahul Gandhi
Rahul Gandhi : ‘एकलव्य अन् त्याच्या अंगठ्याप्रमाणेच….’; संविधानावरील चर्चेत राहुल गांधींनी मांडले महत्त्वाचे निरीक्षण
Ajit Pawar and Sharad Pawar
NCP Leader : “शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर आनंदच…”, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं वक्तव्य

आज सकाळी माध्यमांशी संवाद साधत असताना मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांची किव येत असल्याचे म्हटले. ते म्हणाले, “भुजबळ यांचे विचार खालच्या दर्जाचे आहेत. गोरगरीब जनता उपाशी राहावी, ही त्यांची इच्छा दिसते. मग ते स्वजातीय असोत किंवा मराठा समाजाचे असोत. त्यांच्या विचारांना आम्ही सुधारू शकत नाहीत. जे गरीब नाभिक आपला व्यवसाय करतात, त्यांनाही आता व्यवसाय करू द्यायचा नाही, असे भुजबळांचे स्वप्न दिसते.”

“छगन भुजबळ तू राजीनामा दे नाहीतर समुद्रात उडी मार..”, मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

माझी गोरगरीब ओबोसी बांधवांना विनंती आहे. तुम्हाला मराठा समाजच साथ देणार आहे. इथून पुढे तरी तुम्ही शहाणे व्हा. भुजबळांना विनाकारण बळ देऊन तुमच्या घरात साप घेऊ नका, अशी जहाल टीका जरांगे पाटील यांनी केली.

छगन भुजबळ ज्या पक्षात जातात, तो पक्ष मोडतात, अशीही टीका जरांगे पाटील यांनी केली. ज्या पक्षाने भुजबळ यांना आता मोठे केले, तोही पक्ष त्यांनी मोडला. त्यांच्या मनात आले तर ते सरकारही मोडून काढतील. त्यामुळे आमची सरकारली विनंती आहे की, अध्यादेशाची लवकर अंमलबजावणी करावी. भुजबळांनी स्वतःचे कुटुंबही अडचणीत आणले आहे. त्यांच्या कुटुंबियांना तुरुंगात जायची वेळ आली आहे. आता गरीबांचे व्यवसाय बंद करा म्हणतात, हे योग्य नाही. लोकशाहीत प्रत्येकाला म्हणणं मांडण्याचं अधिकार आहे. पण गरीबांच्या पोटावर पाय देऊ नये.

Story img Loader