मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हात जोडून विनंती करतो, की कुणीही आत्महत्या करु नका. आंदोलन जिवंत राहूनच करा. आत्महत्या करुन काहीही होणार नाही. आपल्या लेकरांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सगळे एकत्र येऊन प्रयत्न करु. १ डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरु करा असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. जीवन संपवून आपल्या मराठ्यांना न्याय मिळणार नाही. आपल्या डोळ्यांदेखत समाजाला न्याय देण्यासाठी लढा असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.

आपण आता न्यायाच्या जवळ आलो आहोत

२४ डिसेंबरनंतर आंदोलन होणार आहे त्याची तयारी आजपासून करायला लागा. आपण आता न्यायाच्या जवळ आलो आहोत. आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात प्रत्येकाने जाऊन सांगा की आपलं साखळी उपोषण सुरु राहिलं पाहिजे. दिवाळी फराळाचे काही कार्यक्रम राजकीय नेते आयोजित करत असतात. अशा कार्यक्रमांना मराठा समाजाचे लोक या कार्यक्रमांना जातील त्यांना विचारा की आम्हाला आरक्षण कधी मिळणार. जे जाणार नाहीत त्यांचं ठीक आहे. पण जेवायला, फराळाला जाणार असाल तर आरक्षण कधी देणार हे विचारा.

Married Man Marries 15 Women in seven Indian States
Crime News : आधुनिक लखोबा! १५ जणींशी लग्न, सात राज्यांमधल्या बायकांना प्रायव्हेट फोटो दाखवून करायचा ब्लॅकमेल
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
bhandardara dam, new name, adya krantikarak veer raghoji bhangre jalashay
राज्यातील ‘या’ प्रसिद्ध धरणाचे नाव बदलले, आता ‘आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय’ म्हणून ओळखले जाणार
public will teach lesson to those who do politics for votes in name of Chhatrapati says Manoj Jarange Patil
छत्रपतींच्या नावाने मतांसाठी राजकारण करणाऱ्यांचा जनताच कार्यक्रम करणार – मनोज जरांगे पाटील
massive protest in kolkata demanding resignation of cm mamata banerjee
पश्चिम बंगालमध्ये आंदोलनाने तणाव; डॉक्टर प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; पोलिसासह आंदोलक जखमी
Ramsar sites india
भारतात तीन नवीन ‘रामसर’ स्थळांची घोषणा; ‘रामसर’ स्थळ म्हणजे काय? पर्यावरणासाठी ही स्थळे महत्त्वाची का आहेत?
Nagpur, Raj Thackeray, Ladki Bahin Yojana, raj thackeray on ladki bahin yojna, free money, employment, farmers' demands
राज ठाकरे म्हणतात “लाडकी बहीण योजना लवकरच बंद…”
Nashik, Badlapur incident, Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, women empowerment campaign, Tapovan Maidan, opposition politicization,
करोना केंद्रांमधील अत्याचारावेळी गप्प का ? एकनाथ शिंदे यांच्याकडून उध्दव ठाकरे लक्ष्य

मराठा समाजाच्या नेत्यांना विनंती आहे की..

मराठा आरक्षणाचा प्रश्न हा मराठा नेत्यांनी हिवाळी अधिवेशनात उपस्थित करुन घेतला पाहिजे आणि आम्हाला न्याय दिला पाहिजे अशीही मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. विजय वडेट्टीवार यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. ते म्हणत आहेत मला राजकारणात यायचं आहे. मी जे काही करतो आहे ते मराठ्यांच्या लेकरांसाठी करतो आहे. जे आमचं चांगलं होऊ देत नाही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.