मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या उपोषणाचा आज (१४ सप्टेंबर) १७ वा दिवस आहे. मात्र, अद्याप मराठा आंदोलकांच्या मागणीवर अंतिम तोडगा निघू शकलेला नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईहून जालन्याला निघाले आहेत. ते जालन्यात मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे. ते टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

मनोज जरांगे म्हणाले, “समाजासमोर जे विषय ठरले होते त्या विषयावर मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांनी समाजाला प्रबोधन केलं, तर समाजात चांगला संदेश जातो. समाजाचा आत्मविश्वास वाढतो. फक्त यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीची मागणी केली.”

Tirupati Rule Andhra Deputy CM Pawan Kalyan Daughter Signed Declartaion Before Visiting Tirupati Balaji Temple
Tirupati Rule: पवन कल्याणांच्या मुलीने ‘अहिंदू दाखल्या’वर सही करत घेतले तिरुपतीचे दर्शन
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Supriya Sule
Supriya Sule : “दीड ते दोन महिन्यांत आपल्याच विचारांचं सरकार…”, सुप्रिया सुळेंचं महत्त्वाचं विधान
cost of inauguration ceremony of Metro should be taken from honorarium of cm and Deputy cm says MLA Ravindra Dhangekar
मेट्रोच्या उदघाटन सोहळ्याचा खर्च मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मानधनामधून घेतला पाहिजे : आमदार रवींद्र धंगेकर
CM Eknath Shinde his party leaders turning their backs on Mathadi Mela become topic of discussion
नवी मुंबई : माथाडी राजकारणाला शिंदे गटाची बगल? मराठाबहुल मेळाव्यावर भाजपचा प्रभाव
Dharavi News in Marathi
Dharavi Masjid : धारावीत मशिदीचा बेकायदेशीर भाग तोडण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या गाडीची तोडफोड, शेकडो मुस्लिमांचा जमाव एकवटला
aap leader Atishi
विश्लेषण: पहिल्यांदाच आमदार, पाठोपाठ दिल्लीचे मुख्यमंत्रीपद; आतिशींच्या निवडीमागे ‘आप’चे कोणते समीकरण?
cm eknath shinde inaugurates bow string’ arch bridge connecting coastal road sea link
सागरी सेतूमुळे परदेशात आल्याचा भास; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

“आरक्षण घेतल्याशिवाय मी सोडणार नाही”

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटायला येत आहेत. आता आरक्षण मिळेल की नाही हे आत्ताच सांगता येणार नाही. मात्र, आरक्षण घेतल्याशिवाय मी सोडणार नाही. एवढं उत्तर माझ्याकडे आहे,” असं मत मनोज जरांगे यांनी व्यक्त केलं.

“मी मुख्यमंत्र्यांबरोबर बंद खोलीत चर्चा करणार नाही”

मनोज जरांगे पुढे म्हणाले, “मी मुख्यमंत्र्यांबरोबर बंद खोलीत चर्चा करणार नाही, तर माध्यमांसमोरच चर्चा करणार आहे. सगळं समाजाच्या समोरच घडणार आहे. समाज ही चर्चा प्रत्यक्ष बघेल.”

हेही वाचा : “सरकारला मनोज जरांगे पाटलांना संपवायचं आहे, त्यांना…”; संजय राऊतांचा गंभीर आरोप

“उपोषणाला १७ दिवसांनंतर यश आलं असं आत्ताच म्हणता येणार नाही”

“उपोषणाला १७ दिवसांनंतर यश आलं असं आत्ताच म्हणता येणार नाही. जेव्हा सरकार समाजाच्या हातात पत्र देईल त्या दिवशी हा लढा यशस्वी होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता आहे. ते धाडसी निर्णय घेतात. त्या विश्वासानेच आम्ही बोलत आहोत,” असंही मनोज जरांगेंनी नमूद केलं.