मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली. तसेच निर्णय न झाल्यास आज (१ नोव्हेंबर) रात्रीपासून जलत्याग करणार असल्याचाही इशारा दिला. यावर बोलताना मनोज जरांगे यांच्या मुलीने आक्रमक भूमिका घेतली आहे. “माझ्या वडिलांच्या जीवाला काही झालं, तर राजकीय नेत्यांना त्यांच्या घरात घुसून मारेल,” असा इशारा जरांगेंच्या मुलीने दिला. ती टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होती.

मनोज जरांगेंची मुलगी म्हणाली, “शाहू महाराजांनी सांगितलं की, त्यांनी वडिलांना पाणी पाजलं आहे. ते यापुढे पाणी पितील. आम्ही आमची काळजी घ्यावी. त्यांची काळजी करणं सोडावं. आज उपोषणाचा आठवा दिवस आहे आणि सरकारने मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण न केल्यास ते पुन्हा जलत्याग करणार आहेत. हे या सरकारला कळायला नको का?”

Loksatta explained Why are political leaders killed Apart from politics there are other reasons behind the murder
राजकीय नेत्यांच्या हत्या का होतात? हत्येमागे अनेकदा राजकारण वगळता ‘अन्य’ कारणेच?
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
No action has been taken against unauthorized boards due to pressure of political leaders
पालिका आयुक्तांच्या आदेशाला कोणी दाखविली केराची टोपली
Rashmi Joshi, cancer, support, Rashmi Joshi news,
रश्मी जोशी… कॅन्सरग्रस्तांसाठी आधारवड!
Ajit Pawar retirement jibe at uncle Sharad Pawar,
पिंपरी : वडिलधाऱ्यांनी वयाच्या सत्तरीनंतर मुलांकडे जबाबदारी दिली पाहिजे; अजित पवार यांचा शरद पवार यांच्यावर निशाणा
uddhav thackeray criticized mahayuti government
न्यायदेवतेवर विश्वास पण दोन वर्षे न्याय मिळाला नाही! उद्धव ठाकरे यांची खंत
Ajit Pawars trusted Bhausaheb Bhoir rebelled deciding to contest Chinchwad elections independently
चिंचवड : अजित पवारांच्या पक्षातून बंडखोरी; ‘या’ नेत्याने केला अपक्ष लढण्याचा निर्धार
sonam wangchuk s indefinite hunger strike
सोनम वांगचुक यांचे बेमुदत उपोषण

“निर्णय न घेता केवळ तब्येतीची काळजी घ्या सांगतात”

“मागच्यावेळीही १७ दिवस उपोषण केलं. तसेच ४० दिवसात आरक्षण देऊ असं सांगितलं आणि विश्वासघात केला. आता पुन्हा वडील उपोषणाला बसले, तेव्हा निर्णय न घेता केवळ तब्येतीची काळजी घ्या सांगत आहे. याऐवजी सरकारने सरसकट मराठा आरक्षणाचा जीआर काढावा,” अशी मागणी जरांगेंच्या मुलीने केली.

हेही वाचा : “…तर मी आज संध्याकाळपासून पाणी सोडणार”; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले…

“…तर राजकीय नेत्यांना घरात घुसून मारेल”

“सरकार वंशावळीची जीआर काढतं, कुठं नोंदी असलेला जीआर काढतं. सरकार हे दोन जीआर काढत आहे, मग मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण देण्याचा जीआर सरकार का काढत नाही? आता माझ्या वडिलांच्या जीवाला काही झालं, तर एक मुलगी म्हणून सांगते की, मी स्वतः या राजकीय नेत्यांना घरात घुसून मारेन,” असा इशारा जरांगेंच्या मुलीने दिला.