लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : मराठा आरक्षणाच्या लढाईचा प्रवास एकट्या मनोज जरांगे यांनी सुरू केला नाही तर दिवंगत नेते आण्णासाहेब पाटील यांनी १९८० साली तो सुरू केला होता. त्यानंतर अन्य काहीजणांनी त्यासाठी पाठपुरावा केला. यापूर्वी मराठा आरक्षण प्रश्नावर दोन समाजात वाद निर्माण केला गेला नव्हता. कालपर्यंत जरांगे हे समाजकारण करीत होते. परंतु आज ते केवळ पाडापाडीचे राजकारण करीत आहेत, असा आरोप आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला आहे.

BJP MP Ashok Chavan
Ashok Chavan : “राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम तेव्हा झाला”, अशोक चव्हाणांचं मोठं विधान; म्हणाले, “काँग्रेस…”
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Sonia Gandhi , Census , Food Security Act, Complaint ,
सोनिया गांधींची जनगणनेची मागणी, कोट्यवधींना अन्न सुरक्षा कायद्याचा लाभ मिळत नसल्याची तक्रार
PM Narendra Modi Speech
Narendra Modi : आणीबाणी ते कलाकारांवर बंदी! नरेंद्र मोदींनी ‘हे’ पाच मुद्दे उपस्थित करत काँग्रेसला करुन दिली संविधानाची आठवण
Udayanraje Bhosale angry on actor rahul solapurkar
“… त्याला गोळ्या घातल्या पाहिजेत”, राहुल सोलापूरकरच्या विधानावार खासदार उदयनराजे भोसलेंची संतप्त प्रतिक्रिया
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
pressure politics Ajit Pawar backing Dhananjay Munde NCP Beed walmik karad
अजित पवार हे धनंजय मुंडे यांना पाठिशी का घालत आहेत ?

सोलापुरात एका पत्रकार परिषदेत बोलताना नरेंद्र पाटील यांनी जरांगे यांच्यावर थेट हल्ला चढविताना ते महायुती सरकारवर विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना जाणीवपूर्वक लक्ष्य बनवत असल्याचा आरोप केला.

आणखी वाचा-गणराय निघाले तरी सोलापूर, ‘आनंदाचा शिधा’पासून वंचित

ते म्हणाले, मराठा आरक्षण देण्यासाठी महायुती सरकार नेहमीच सकारात्मक राहिले आहे. याच सरकारच्या काळात लाखो कुणबी पुरावे शोधून दिले. परंतु याच सरकारमधील एका प्रमुख पक्षाच्या नेत्याच्या विरोधात जरांगे हे टीकेची राळ उठवत आहेत. विशिष्ट पक्षाच्या विरोधात आंदोलने केली जात आहेत, असा आरोप करतानाच आता मराठा समाज सावध झाला आहे. जरांगे यांच्या मागे बोलवता धनी कोण हे शोधावे, असेही पाटील यांनी सांगितले. मराठा समाजासाठी दहा टक्के आर्थिकदृष्ट्या मागास आरक्षण केंद्राने दिले आहे. हे आरक्षण समाजाच्या हिताचे आहे, असा दावा त्यांनी केला.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने राज्यात एक लाखाहून अधिक तरुणांना उद्योग व्यवसायासाठी अर्थसाह्य उपलब्ध करून दिले आहे. सोलापुरात लोकमंगल सहकारी बँकेच्या माध्यमातून अर्थसाह्य मिळालेल्या लाभार्थी तरुणांचा मेळावा येत्या २१ सप्टेंबर रोजी हुतात्मा स्मृती मंदिरात होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली

Story img Loader