लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : मराठा आरक्षणाच्या लढाईचा प्रवास एकट्या मनोज जरांगे यांनी सुरू केला नाही तर दिवंगत नेते आण्णासाहेब पाटील यांनी १९८० साली तो सुरू केला होता. त्यानंतर अन्य काहीजणांनी त्यासाठी पाठपुरावा केला. यापूर्वी मराठा आरक्षण प्रश्नावर दोन समाजात वाद निर्माण केला गेला नव्हता. कालपर्यंत जरांगे हे समाजकारण करीत होते. परंतु आज ते केवळ पाडापाडीचे राजकारण करीत आहेत, असा आरोप आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला आहे.

Ganeshotsav was coming to an end in Solapur district anandacha shidha did not reach to people
गणराय निघाले तरी सोलापूर, ‘आनंदाचा शिधा’पासून वंचित
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Girish Mahajan On Eknath Khadse
Girish Mahajan : “ते पक्ष सोडून गेले, त्यांच्या पत्नी देखील निवडून आल्या नाही”, गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर टीका
ajit pawar ramraje naik nimbalkar
Ramraje Naik Nimbalkar : “तुतारी वाजवायला किती वेळ लागतोय”, रामराजे नाईक-निंबाळकरांचा अजित पवारांना इशारा; नेमकं काय म्हणाले?
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Supriya Sule And Rashmi Thackeray
Varsha Gaikwad : “….तर रश्मी ठाकरे आणि सुप्रिया सुळे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील”, काँग्रेस खासदाराचं वक्तव्य चर्चेत
Ashok Chavan Bhaskarrao Khatgaonkar Patil
Ashok Chavan : “आमच्याबरोबर राहिले तर सुरक्षित राहतील”, अशोक चव्हाणांचा ‘या’ नेत्याला इशारा
Movement of Maratha community against Manoj Jarange patil
मनोज जरांगे यांच्या विरोधात बार्शीत मराठा समाजाचे आंदोलन

सोलापुरात एका पत्रकार परिषदेत बोलताना नरेंद्र पाटील यांनी जरांगे यांच्यावर थेट हल्ला चढविताना ते महायुती सरकारवर विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना जाणीवपूर्वक लक्ष्य बनवत असल्याचा आरोप केला.

आणखी वाचा-गणराय निघाले तरी सोलापूर, ‘आनंदाचा शिधा’पासून वंचित

ते म्हणाले, मराठा आरक्षण देण्यासाठी महायुती सरकार नेहमीच सकारात्मक राहिले आहे. याच सरकारच्या काळात लाखो कुणबी पुरावे शोधून दिले. परंतु याच सरकारमधील एका प्रमुख पक्षाच्या नेत्याच्या विरोधात जरांगे हे टीकेची राळ उठवत आहेत. विशिष्ट पक्षाच्या विरोधात आंदोलने केली जात आहेत, असा आरोप करतानाच आता मराठा समाज सावध झाला आहे. जरांगे यांच्या मागे बोलवता धनी कोण हे शोधावे, असेही पाटील यांनी सांगितले. मराठा समाजासाठी दहा टक्के आर्थिकदृष्ट्या मागास आरक्षण केंद्राने दिले आहे. हे आरक्षण समाजाच्या हिताचे आहे, असा दावा त्यांनी केला.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने राज्यात एक लाखाहून अधिक तरुणांना उद्योग व्यवसायासाठी अर्थसाह्य उपलब्ध करून दिले आहे. सोलापुरात लोकमंगल सहकारी बँकेच्या माध्यमातून अर्थसाह्य मिळालेल्या लाभार्थी तरुणांचा मेळावा येत्या २१ सप्टेंबर रोजी हुतात्मा स्मृती मंदिरात होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली