मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांचं आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू आहे. दुसरीकडे राज्यात जाळपोळीच्या घटना घडत आहेत. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक आणि वाहनांना आग लावण्यात आली होती. त्यानंतर आमदार संदीप क्षिरसागर घराला तर जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यालयाला आग लावल्याच्या घटना समोर येत आहेत.

जाळपोळीच्या घटनांमुळे बीडमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. यावर मनोज जरांगे-पाटील यांनी भाष्य केलं आहे. “साखळी आणि आमरण उपोषण करा, असं मराठा समाजाला सांगितलं होतं. करोडोच्या संख्येने मराठा समाज शांततेत आंदोलन करत आहे. जाळपोळ आणि उद्रेक करू नका,” असं आवाहन जरांगे-पाटील यांनी केलं आहे.

kapil sharma
कपिल शर्मा यशस्वी झाल्यानंतर अहंकारी झाल्याच्या दाव्यांवर सहकलाकाराचे वक्तव्य; म्हणाला, “५ टक्केसुद्धा…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
PM Narendra Modi Speech
Narendra Modi : आणीबाणी ते कलाकारांवर बंदी! नरेंद्र मोदींनी ‘हे’ पाच मुद्दे उपस्थित करत काँग्रेसला करुन दिली संविधानाची आठवण
beed politics Devendra Fadnavis Suresh Dhas pankaja munde dhananjay munde
माध्यमांमध्ये ‘ आवाज’ बनलेल्या सुरेश धस यांच्या पाठिशी देवेंद्र फडणवीस
PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशातल्या एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, तेच म्हणाले होते…”
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
MLA Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “आणखी बऱ्याच जणांवर मकोका लागायचाय”, सुरेश धसांचा मोठा इशारा; म्हणाले, “बीडमध्ये अजून…”
What Pankaja Munde Said?
Pankaja Munde : पंकजा मुंडेंचं वक्तव्य; “राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं, काही लोक सुपारी…”

हेही वाचा : प्रकाश सोळंकेंच्या घरावर दगडफेक, वाहनांची जाळपोळ; भाजपाचे मंत्री म्हणाले, “गावबंदीपर्यंत समजू शकत होतो, पण…”

“हे कोण करतेय, ही शंका येत आहे. उद्यापर्यंत जाळपोळ केल्याची माहिती माझ्यापर्यंत येऊ नये. अन्यथा मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल. गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे. धिंगाणा घालण्याचा नाही. जाळपोळीला माझं समर्थन नाही,” अशा शब्दांत जरांगे-पाटलांनी आंदोलकांना खडसावलं आहे.

हेही वाचा : अजित पवार गटातील आमदाराच्या घरावर दगडफेक, वाहनं जाळली; सुप्रिया सुळे फडणवीसांवर संतप्त होत म्हणाल्या…

“सत्ताधारी पक्षातील लोकच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घरे जाळत आहेत. आणि शांततेच्या मराठा आंदोलनाला डाग लावण्याचा आणि चिघळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, आंदोलन शांततेत सुरू राहणार आहे. उद्रेक करण्याची काहाही गरज नाही. उद्रेक न करताही मराठा आरक्षण मिळवता येते. तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात सरकार जेरीस येईल. आपल्या दारात कुठल्याही राजकीय नेत्यानं यायचं नाही. मग, आपण नेत्याच्या दारात कशासाठी चाललो आहे?” असा सवाल जरांगे-पाटलांनी उपस्थित केला.

Story img Loader