मराठा आरक्षणाची मागणी करत मराठा क्रांती मोर्चाचे जालन्यातील समन्वयक मनोज जरांगे पाटील हे गेल्या आठ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. शांततेच्या मार्गाने त्यांचं आंदोलन सुरू होतं. अशातच गेल्या आठवड्यात (१ सप्टेंबर) पोलिसांनी या आंदोलकांवर लाठीहल्ला केला. या लाठीहल्ल्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. या लाठीहल्ल्यावरून विरोधी पक्षांनी राज्य सरकारला धारेवर धरलं. राज्यातले विरोधी पक्षांचे अनेक मोठे नेते जालन्यात जाऊन जरांगे पाटलांची भेट घेऊन आले. या नेत्यांनी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटलांची उपोषणस्थळी जाऊन विचारपूस केली. त्यामुळे राज्यभरातून जरांगे-पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळू लागला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा