मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज हिंगोलीत समाजबांधवांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “आरक्षण मिळालं नाही तर सरकारला आपली ताकद दाखवून देऊ. मी लोकसभा निवडणुकीत ‘पाडा’ (ठराविक उमेदवारांना पराभूत करा) म्हटल्यावर त्यांचं बरंच नुकसान झालं. आता मी जाहीर आव्हान दिलंय. येत्या १३ जुलैपर्यंत आरक्षणाचा तिढा सुटला नाही तर मी उमेदवारांची नावं घेऊन त्यांना पाडायला सांगणार आहे.” यावेळी जरांगे पाटील यांनी सांगितलं की त्यांच्या ‘पाडा’ या शब्दाची सरकारला भिती आहे. सरकारमधील मंत्री त्यांना विनंती करतात की निवडणुकीत कोणालाही पाडा म्हणू नका.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, “अनेक मंत्री माझ्याकडे येऊन मला म्हणतात की पाटील तुम्ही निवडणुकीत काहीही म्हणा, परंतु ‘पाडा’ म्हणू नका. अलीकडेच एक मंत्री माझ्याकडे आले होते. ते मला म्हणाले, पाटील तुमच्याकडे दुसरा शब्द नाही का? मी विचारलं कोणता शब्द? तर ते म्हणाले, पाडा या शब्दाऐवजी दुसरा कुठला शब्द नाहीये का? तुम्ही पाडा म्हटलं की काळजात धस्स होतंय. तुम्ही आमचे उमेदवार पाडा म्हणाला नाहीत तरी देखील त्या शब्दाने अनेकांना घाम फुटतो. त्यामुळे दुसरं काहीतरी म्हणा.”

Chandrakant patil loskatta news
चावडी : चंद्रकांतदादांची ‘साखरझोप’
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Yogesh Kadam On Sanjay Shirsat :
Yogesh Kadam : शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली? “संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत महत्त्व नाही”, योगेश कदमांचं विधान
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
Shatrughan Sinha Campaign for AAP
शत्रुघ्न सिन्हा दिल्लीत ‘आप’चा प्रचार करणार; तृणमूलकडून काँग्रेसला ‘खामोश’ करण्याची रणनीती
Chandrakant Patil on Dhananjay Munde
Chandrakant Patil: “… तर मुख्यमंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील”, चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान

मंत्र्याबरोबर झालेला संवाद सांगत मनोज जरांगे पाटील म्हणाले, “आपल्या ‘पाडा’ या एका शब्दाने लोकांची किती फजिती झाली आहे. उद्या जर सगळ्या मराठ्यांनी नाव घेतलं (उमेदवाराचं) तर तुमच्या नावाने मतंच मिळणार नाहीत.”

जरांगे-पाटील म्हणाले, मला किंवा माझ्या समाजाला, आमच्यापैकी कोणालाही राजकारणात यायचं नाही. आम्हाला केवळ सर्वसामान्य मराठा कुटुंबांचं भलं पाहायचं आहे. मराठ्यांची लेकरं मोठी व्हावीत, हाच आमचा उद्देश आहे. समाजाच्या विकासासाठी आरक्षण मिळायला हवं. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून देणं हे एकमेव उद्दिष्ट आम्ही डोळ्यासमोर ठेवलं आहे. आमची लेकरं मोठी व्हावी यासाठी आम्हाला आरक्षण हवं आहे. आमच्यापैकी कोणालाही राजकारण करायचं नाही, तशी कोणाची इच्छा देखील नाही. परंतु, आम्हाला कोणी राजकारणाकडे ओढलं तर तुमची फजिती होईल एवढं लक्षात ठेवा.

हे ही वाचा >> “सामना अजून संपलेला नाही, कोण कोणाची विकेट घेतं हे…”; ठाकरे गटाचा मुख्यमंत्री शिंदेंना इशारा

मनोज जरांगे यावेळी भावनिक होत म्हणाले, “मी उघड्यावर पडलो तरी मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याच्या कामात मागे हटणार नाही. मराठा समाजाला मी मायबाप मानलं आहे. माझा समाज माझ्यासाठी सर्वकाही आहे. माझ्या समाजाने मला काहीही कमी पडू दिलेलं नाही. मात्र आपल्या समाजातील लोकांनीही मला दु:ख द्यायला नाही पाहिजे. माझी हात जोडून समाजाला विनंती आहे, मायबापा हो मी समजासाठी लढतोय. माझा समाज मोठा होईल म्हणून तुम्ही पाठिशी राहा.”

Story img Loader