महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, मग काहीही झालं तरीही हरकत नाही. आता माघार घेणार नाही असं वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी केलं आहे. छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची सभा पार पडली. या सभेत बोलत असताना त्यांनी मराठा तरुणांनी आत्महत्या करु नये असं आवाहन करत आपल्याला न्याय मिळणारच असंही म्हटलं आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

“मायबाप मराठ्यांनो सरकारने आपला वेळ घेतला आहे, आपण सरकारला आपला वेळ दिला आहे. या संधीचं सोनं करा, अशी पुन्हा येणार नाही त्यामुळे एकजूट राहा. तुमच्यात जर काही मतभेद असतील तर ते बाजूला ठेवा. पण आजच्या घडीला मराठा म्हणून सगळे एकजूट व्हा, एकजूट राहा. तुमचे कुठलेही टोकाचे मतभेद असतील तरी ते बाजूला ठेवा, कारण मराठा आरक्षणाचा घास हातातोंडाशी आला आहे. १४ ऑक्टोबरला आपण सरकारला दिलेला ३० दिवसांचा वेळ संपतो आहे. त्यावर आपण त्यांना १० दिवस बोनस दिले आहेत. २४ ऑक्टोबरला ४० दिवस संपणार आहेत. आंतरवली सराटी या ठिकाणी १४ तारखेला मराठा समाजाचा कार्यक्रम ठेवला आहे. छत्रपती संभाजी नगरसह परिसरातले सगळे मराठे तिथे आले पाहिजेत. आपल्या एकीचं विराट रुप बघून सरकारला दिसलं पाहिजे.”

Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित; “आमच्या मागण्या मान्य न केल्यास मुंबईत आंदोलन, मराठ्यांना…”
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
What Varsha Gaikwad Said?
Varsha Gaikwad : “कुर्ला भागातील मदर डेअरीची जमीन गौतम अदाणींच्या घशात…”; खासदार वर्षा गायकवाड यांचा आरोप
State Sports Minister Datta Bharane reaction on sharad pawar and ajit pawar coming togather
“शरद पवार, अजित पवार एकत्र आले तर…”, दत्ता भरणेंच्या वक्तव्याची चर्चा
Ajit Pawar avoided to sitting next to sharad pawar
Ajit Pawar : शरद पवारांच्या बाजूला बसणं का टाळलं? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “माझा आवाज…”
Chhagan Bhujbal On Ajit Pawar
Chhagan Bhujbal : अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीचं षडयंत्र कुणी रचलं? भुजबळांचं मोठं विधान; म्हणाले, “शरद पवार अन् खर्गेंचा वाद…”
Ajit Pawar
“जनमानसात खराब प्रतिमा असणाऱ्यांना पक्षात घ्यायचं नाही”, अजित पवारांचा रोख कोणाकडे? राष्ट्रवादीच्या शिबिरात म्हणाले…
MLA Rohit Pawar On NCP Sharad Pawar
Rohit Pawar : शरद पवार भाकरी फिरवणार? रोहित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “आमच्या पक्षात फेरबदल…”

मराठ्याच्या पोरांनी आत्महत्या करायच्या नाहीत

“आपल्याला आंदोलन करावं लागलं तर ते शांततेत करायचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट मराठ्याच्या पोरांनी आत्महत्या करायच्या नाहीत. आंतरवालीमध्ये येताना शांततेत या आणि शांतेत जा कारण तिथे बऱ्याच माता-भगिनी येणार आहेत.” असंही आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. १४ ऑक्टोबरला होणाऱ्या कार्यक्रमाला कुणीही गालबोट लागू द्यायचं नाही असंही आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं. तसंच एकजूट ठेवा, एकजूट संपवू नका असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

पाच हजार पानांचा महत्त्वाचा आधार आता आपल्याकडे

आपल्याला आता पाच हजार पानांचा महत्त्वाचा आधार मिळाला आहे. त्यामुळे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र सरसकट देण्यातली अडचणच संपली आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मंडल कमिशनने ओबीसी जाती आरक्षणात घातल्या, त्यानंतर ज्या जाती घातल्या त्या पोटजाती म्हणून घातल्या. कारण काहीही समिती वगैरे त्यासाठी केली नव्हते. आम्ही सांगितलं पोटजातींचा समावेश जर आरक्षणात केला तर मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का? हा प्रश्न मी माझ्याकडे आलेल्या मंत्र्यांना विचारला होता तेव्हा ते निरुत्तर झाले होते, असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

१ जून २००४ ला मराठा आणि कुणबी एकच असल्याचा प्रस्ताव पारित झाला आहे. त्यात काही बदल आवश्यक आहेत. अटी-शर्ती काढून तो नव्याने आणला गेला पाहिजे, २०२३ चा शासन निर्णयानुसार कुणबी प्रमाणपत्र द्या असाही पर्यायही मी दिला होता. त्यानंतर त्या प्रस्तावात दुरुस्ती करण्यात आली. त्या प्रस्तावात असं लिहिलं होतं की वंशावळीच्या नोंदी असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येतील. मात्र त्यातही सुधारणा हवी होती कारण वंशावळीच्या नोंदी आमच्याकडे नाहीत हे त्यांना सांगितलं. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला मराठा समाजाच्या वेदना ठाऊक आहे. मी जिवंत असेपर्यंत मायबाप मराठ्यांशी गद्दारी करणार नाही असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Story img Loader