मराठा आंदोलक मनोज जरांगे हे मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर येथे उपचार घेत होते. त्यांना नुकताच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. त्यांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. आंदोलनस्थळी पोहोचल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून सरकारला थेट इशारा दिला आहे.

४० दिवसांत मराठा आरक्षण मिळालं नाही, तर आम्ही कशी फजिती करतो, हेच पाहा, अशा शब्दांत मनोज जरांगेंनी सरकारला इशारा दिला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, “एकदा शब्द दिल्यावर आम्ही मराठे मागे हाटत नाही. पण आम्हाला ४० दिवसांनी आरक्षण मिळालं पाहिजे. त्यासाठी तुम्ही काय करायचं? तुमच्या समितीनं काय करायचं? या भानगडीत आम्हाला पडायचं नाही. आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे आणि ते आम्ही मिळवणार म्हणजे मिळवणार.”

if Maratha society got cheated file case of fraud says Bipin Chaudhary
“मराठा समाजाला धोका दिल्यास फसवणुकीचा गुन्हा दाखल करा” जरांगेंच्या आवाहनाला…
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Salman Khan News 25 Lakh Contract to Hit Him AK 47 From Pak Said Police Chargesheet
Salman Khan : “सलमान खानला मारण्यासाठी २५ लाखांची सुपारी आणि…”, बिश्नोई गँगचा कट काय होता?
Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar
“मनोज जरांगे मराठा समाजासाठी रस्त्यावर उतरले, पण…”, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य; मविआचा उल्लेख करत म्हणाले…
manoj jarange patil criticized devendra fadnavis
“आता देवेंद्र फडणवीसांचा सुपडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही”, आचारसंहिता जाहीर होताच मनोज जरांगेंचा थेट इशारा; म्हणाले…
dhananjay munde criticized manoj jarange patil
नारायणगडावरील दसऱ्या मेळाव्यावरून धनंजय मुंडेंची मनोज जरांगेंवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले, “नवीन मेळावा सुरु करून…”
Ramraje Nimbalkar, Ajit pawar NCP, NCP,
रामराजे निंबाळकर पक्षातच; कार्यकर्ते मात्र ‘तुतारी’ घेणार
Sayaji Shinde Join Ajit Pawar NCP
Sayaji Shinde : अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्येच का प्रवेश केला? सयाजी शिंदे म्हणाले, “मला या पक्षाची स्ट्रॅटेजी…”

हेही वाचा- “मराठा आंदोलन मोडून काढण्यासाठी संभाजी भिडेंना…”, ठाकरे गटाच्या नेत्याचा सरकारवर गंभीर आरोप

“हे आंदोलन सर्वसामान्य लोकांनी उभं केलं आहे. तुम्ही आतापर्यंत सगळे डाव टाकले आहेत. आता डाव टाकण्याची वेळ आमची आहे. आमचा डाव पडला तर तुमची कशी फजिती करतो, ते पाहाच,” अशा शब्दात मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे.

हेही वाचा- ओबीसी आरक्षणातले वाटेकरी कसे वाढले? छगन भुजबळांनी सांगितली आकडेवारी

सरकारला उद्देशून मनोज जरांगे पुढे म्हणाले, “तुम्ही आधी सांगितलं की आमचं आंदोलन विरोधीपक्षाने उभं केलंय. नंतर तुम्हाला काहीच सापडलं नाही. आता वेगळंच सांगितलं जातंय की, हे आंदोलन सत्ताधाऱ्यांनीच उभं केलंय. पण असं कधी होऊ शकतं का? त्यांचे सगळे डाव आता सर्वसामान्य लोकांनी ओळखले आहेत.”