“येत्या १३ जुलैपर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून द्यायचं आहे, तोवर कुणीही गाफील राहू नका”, असा सल्ला मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला दिला आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आज परभणी येथे मराठा समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला जरांगे यांनी संबोधित केलं. यावेळी ते म्हणाले, “सरकारने आपल्याला १३ जुलैपर्यंत आरक्षण दिलं नाही तर आपण आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना चोख प्रत्युत्तर देऊ. सरकारने आरक्षण दिलं नाही तर राज्यातील विधानसभेच्या सर्व २८८ मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे करायचे की त्यांचे २८८ उमेदवार पाडायचे याचा निर्णय लवकरच घेऊ.”

मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला उद्देशून म्हणाले, “गाफील राहू नका, हा माझा नेता, तो तुझा नेता असा वाद घालत बसू नका. आपण इतकी वर्षे आपल्या नेत्यांना मोठे करत आलो आहोत. आता आपल्या मुलांना कसं मोठं करता येईल ते पाहा. अनेकांनी आपल्या मुलांना मरताना पाहिलं आहे. आरक्षण नसल्यामुळे खचलेलं पाहिलं आहे. परंतु, आता आपली लेकरं मोठी करायची आहेत आणि आपल्या लेकरांना मोठं करण्यासाठी आरक्षणाची गरज आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून द्यायचं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आपण थांबायचं नाही.”

What Pawan Kalyan Said?
Pawan Kalyan : ‘सनातन धर्मा’च्या रक्षणासाठी केंद्रीय कायदा हवा’, आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची मागणी
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Narendra Modi statement that the people of Kashmir are waiting for a terror free government print politics news
काश्मिरी जनतेला दहशतवादमुक्त सरकारची प्रतीक्षा – मोदी
yuvasena s dipesh mhatre
कडोंमपाच्या नाममुद्रेचा दिपेश म्हात्रेंनी गैरवापर केल्याची भाजपची आयुक्त डॉ. जाखड यांच्याकडे तक्रार; कायदेशीर कारवाईची मागणी
Jagan Mohan reddy
Tirupati Laddu Row : “…तर दूरगामी परिणाम होतील”, लाडूप्रकरणावरून जगनमोहन रेड्डींनी पंतप्रधानांना पत्र लिहित व्यक्त केली भीती
Vikas Thackeray statement regarding all the six seats in Nagpur
महाविकास आघाडीत बिघाडीची चिन्हे, नागपुरातील सहाही जागांवर काँग्रेसचा दावा; विकास ठाकरे म्हणतात…
Vice President said Today we are in corruption free India
नागपूर : देशातून दलालांची जात संपूर्णपणे नष्ट, उपराष्ट्रपती धनखड म्हणतात,‘सरकारी नोकऱ्या…’
warning to the government for reservation of Dhangar community
धनगर समाजाचा आरक्षणासाठी सरकारला निर्वाणीचा इशारा

मराठा आंदोलक जरांगे पाटील म्हणाले, “मी सर्वांना शेवटचं सांगतो, संपूर्ण ताकदीने एकत्र राहा. आपली शक्ती कमी पडू देऊ नका. या सरकारने आपल्याला आरक्षण दिलं नाही तर आपण महाराष्ट्रातील मराठा समाजाची सर्वात मोठी बैठक आयोजित करू. एका विशाल मैदानावर ही बैठक घेऊ आणि या बैठकीत आपण पुढचं नियोजन करू. या सरकारने आपल्याला आरक्षण दिलं नाही तर काय करायचं याचा निर्णय त्या बैठकीत घेऊ. २८८ मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे करायचे की त्यांचे २८८ उमेदवार पाडायचे त्याचा निर्णय त्या बैठकीत घेतला जाईल.”

हे ही वाचा >> “१३ जुलैला शिवभक्तांसह विशाळगडावर जाऊन आम्ही…”, अतिक्रमणाविरोधात संभाजीराजे आक्रमक; सरकारला अल्टीमेटम

मनोज जरांगे यांनी यावेळी मराठा समाजातील लोकांना १०० टक्के मतदान करण्याचं आवाहनही केलं. पाटील म्हणाले, “आपली एकजूट आता सर्वांनी पाहिली आहे. ही एकजूट कायम ठेवा. आपली एकजूट पाहून काही जण शहाणे झाले आहेत. ते आता आपल्यासारखे वागू लागले आहेत. परंतु, आपण आपला विषय मागे पडू द्यायचा नाही. मला अपेक्षा आहे की हे सरकार येत्या १३ जुलैपर्यंत आपल्याला आरक्षण देईल आणि नाही दिलं तर यांचे २८८ आमदार पडलेच म्हणून समजा.”