मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम आज संपणार आहे. परंतु, सरकारकडून अद्याप काहीच हालचाली दिसत नाहीत. याप्रकरणी चर्चा करण्याकरता फेब्रुवारीत विशेष अधिवेशन भरवलं जाईल, असं हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. असं असतानाच बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत २० जानेवारीला आमरण उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं. २० जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर ते बेमुदत उपोषण करणार आहेत. यावरून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

“सरकार अतिशय सकारात्मकतेने काम करतंय. मुख्यमंत्री स्वतः या संपूर्ण प्रकरणात लक्ष घालून आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाने अतिशय वेगाने काम सुरू केलं आहे. शिंदे समितीचा दुसरा अहवाल आला आहे, तिसरा अहवालही अपेक्षित आहे. त्यात निजामकालीन नोंदी हैदराबादहून प्राप्त करून घेत आहोत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Pankaja Munde
Pankaja Munde : वेगळा पक्ष काढण्याच्या विधानावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, “त्या विधानाचा अर्थ…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
chief minister fadnavis criticized legislature for neglecting lawmaking and economic development tasks
विधीमंडळाच्या कामाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली नाराजी, म्हणाले…!
Legislative Council Chairman Ram Shinde testimony regarding the work of the society Pune news
मंत्री नसलो तरी सगळ्या मंत्र्यांकडून काम करून घेऊ; विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांची ग्वाही
ugc decides to extend deadline for selection of professors principals vice chancellors pune news
प्राध्यापक, प्राचार्य, कुलगुरू निवड मसुद्यावर किती हरकती-सूचना? २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा यूजीसीचा निर्णय
Central Civil Services information in marathi
मुलाखतीच्या मुलखात : केंद्रीय सेवा
Maharashtra Growth Momentum Fadnavis Updates at NITI Aayog
राज्याच्या विकासाचा वेग कायम राखण्यासाठी आराखडा महत्वाचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
GBS rapid response team confirms that they focus on Pune in state
राज्यात पुण्यावरच लक्ष! जीबीएसच्या शीघ्र प्रतिसाद पथकाचा निर्वाळा

हेही वाचा >> “२० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण”, बीडमधून जरांगे-पाटलांची मोठी घोषणा

“राज्य सरकारची सकारात्मकता बघता असा निर्णय (उपोषणाचा) त्यांनी (जरांगेंनी) घेऊ नये. राज्य सरकार योग्य काम करतंय, तसा निर्णय ते घेणार आहेत. आम्ही पूर्ण शक्तीने काम करत आहोत. ओबीसी समाजाला त्रास, अन्याय होणार नाही याची संपूर्ण काळजी घेत मराठा समाजाच्या आरक्षणावर सकारात्मक पद्धतीने कार्यवाही सुरू आहे”, असंही फडणवीस म्हणाले.

मनोज जरांगे काय म्हणाले होते?

“सरकारनं मराठ्यांना नोटीसा दिल्या आणि मुंबईत १८ जानेवारीपर्यंत १४४ कलम लागू केलं. त्यामुळे २० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण करण्यात येईल. २० जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानावर मी आमरण उपोषण करणार आणि मला भेटण्यासाठी मराठे येतील. शांततेच्या आणि कायदेशीर मार्गानं आपण उपोषण करू. पण, कोण कुठं बसेल माहिती नाही. रोड मोकळी करून बसण्याची व्यवस्था करावी. नाहीतर आमच्या धोरणाने आम्ही बसू. मात्र, मराठ्यांनी मुंबईकडे कूच केली, तर विराट समुदाय माघारी फिरणार नाही. आरक्षण घेऊनच माघारी फिरू,” असा इशारा जरांगे-पाटलांनी सरकारला दिला आहे.

Story img Loader