मराठा आरक्षणासाठीचा सर्वात मोठा लढा हा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उभा केला आहे. त्यांच्या आंदोलनावर आंतरवली सराटी या ठिकाणी जेव्हा लाठीमार झाला त्यानंतर या मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झालेले पाहण्यास मिळाले. त्यांनी आपलं म्हणणं शांतपणे पण तितक्याच ठामपणे वारंवार मांडलं. दोनवेळा ते उपोषणालाही बसले होते. तसंच आज सकाळी ११ वाजल्यापासून त्यांच्या उपोषणाला पुन्हा सुरुवात झाली आहे.

मराठा आरक्षणासाठी जीव गेला तरीही चालेल मात्र आरक्षण घेतल्याशिवाय मी परत येणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. तसंच आज मनोज जरांगे पाटील यांनी वाशीतच थांबण्याचा निर्णय घेतला आहे. अध्यादेश मिळाला पाहिजे नाहीतर आझाद मैदानात येणार अशीही भूमिका त्यांनी घेतली आहे.

PM Narendra Modi and Rahul Gandhi
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं राहुल गांधींना जोरदार उत्तर, “आम्ही संविधान जगणारे लोक, खिशात संविधान घेऊन…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
What Rahul Gandhi Said?
Rahul Gandhi : राहुल गांधींचं वक्तव्य, “मेक इन इंडिया चांगली योजना, पंतप्रधानांनी प्रयत्नही केले पण…”
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”

मनोज जरांगे विरुद्ध छगन भुजबळ वाद गाजला

मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हा हा लढा सुरु केला त्यानंतर काही दिवसांनी छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे पाटील असाही एक वाद निर्माण झाला. कारण ओबीसींच्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देऊ नये अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली होती. त्यानंतर छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोपही झाले. अशात आता मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा वाशीत आल्यानंतर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

काय म्हणाले आहेत छगन भुजबळ?

“कायद्याचा कसोटीवर जे काही उतरेल ते देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. नियमांमध्ये काय बसतं आहे ते सरकार पाहतं आहे. मात्र ओबीसींवर अन्याय होता कामा नये या मतावर आम्ही ठाम आहोत. जर उद्या ओबीसींवर अन्याय झाला हे लक्षात आलं तर निश्चितपण ओबीसींचंही आंदोलन सुरु होईल. मला वाटतं की सरकार दोन्ही बाजूंचा विचार करुन योग्य निर्णय घेतील. जी आमची मतं आहेत ती आम्ही सभांमधून मांडत असतो. मात्र ओबीसींवर अन्याय झाला तर आम्हीही आंदोलन करु” असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

Story img Loader