“शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ५ आणि आमदार १६ आहेत. अशी व्यक्ती दिल्लीच्या रामलीला मैदानावर जाऊन देशाच्या पंतप्रधानांवर बोलते. पण त्यांची राजकीय उंची किती? एकदा मुख्यमंत्री झाले म्हणून एवढे बोलतात? त्यांची राजकीय उंची काय? पंतप्रधानांवर बोलण्याची त्यांची वैचारीक उंची नाही. आमच्या भाजपाचे ३०३ खासदार आहेत आणि ठाकरे गटाचे ५ खासदार आहेत. हे पानावर टाकण्याएवढी चटणीही नाही. मग फक्त मुख्यमंत्री झाले म्हणून तुम्ही एवढे बोलणार का? हे मोदींवर टीका करतात. म्हणतात की, पंतप्रधान मोदींचा पक्ष तडीपार करा. जर आमची केंद्रामध्ये आणि राज्यात सत्ता आहे, तर तडीपार करायचे ठरले तर आम्ही कुणाला तडीपार करू, कोरोनाच्या काळात ज्यांनी पैसे खाल्ले त्यांना तडीपार करू ना?”, असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा