भाजपामध्ये मी प्रवेश केला तेव्हा बाळासाहेब थोरात यांनी एकट्याने खिंड लढवू अशी गर्जना केली होती. मात्र, आता त्यांनी खिंड सोडून पळ काढल्याचा टोला राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कराडमध्ये पत्रकारांशी बोलताना लगावला. माजी आमदार आनंदराव पाटील, भाजपनेते डॉ. अतुल भोसले या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>> आदित्य ठाकरेंविषयी प्रश्न विचारताच तानाजी सावंत आक्रमक; म्हणाले “मेंटल हॉस्पिटल…”

Arvind Kejriwal
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांना दिल्लीकरांनी का नाकारलं? ‘आप’वर मतदार असमाधानी का होते? सर्वेक्षणातून समोर आली कारणं
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Arvind Kejriwal rise in Indian politics
केजरीवाल यांचा भारतीय राजकारणात उदय कसा झाला? पहिल्या मोठ्या पराभवानंतर केजरीवाल राजकारणात कसे टिकणार?
Devendra Fadnavis to Inaugurate TJD Deccan Summit 2025
ठाकरे, पवारांचे आधीच ठरले होते, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे वक्तव्य !
revenue minister chandrashekhar bawankule on son law loan catering money Wardha
“जावयाचं कर्ज नको, हे घ्या जेवणाचे पैसे,” महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे असे का म्हणाले?
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Raj Thackeray should come to Sangamner to see why Balasaheb Thorat was defeated says MLA Amol Khatal
माजी मंत्री थोरात यांचा पराभव का झाला ते पाहण्यासाठी राज ठाकरेंनी संगमनेरात यावे – आमदार अमोल खताळ
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका

विधिमंडळातील काँग्रेसच्या नेतेपदाचा राजीनामा दिलेले माजी मंत्री बाळासाहेब थोरात भाजपमध्ये प्रवेश करणार का? या पत्रकारांच्या प्रश्नावर खरेतर हे त्यांनाच विचारायला हवे असे नमूद करून, पण ते भाजपात आलेचतर त्यास आपला विरोध असण्याचे कारण नाही. आणि अशा बाबींमध्ये पक्षनेतृत्वच निर्णय घेतील आणि या निर्णयानुसार आम्ही काम करू असे विखे-पाटील यांनी स्पष्ट केले. विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आणि दरम्यानच्या घडामोडीबरोबरच काँग्रेसचे बंडखोर व अपक्ष विजयी उमेदवार, आमदार सत्यजित तांबे यांच्या भूमिकेबाबत विचारले असता, विखे-पाटील म्हणाले, की सत्यजित तांबे यांना निवडून आणण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी मदत केली. मतदान केल्यामुळे ते विजयी झालेत. त्यामुळे आमदार तांबे यांनी भाजपमध्येच यावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यांना स्वतःच याबाबत निर्णय घ्यायचा असताना निवडणुकीतील विजयानंतर सत्यजित तांबे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानल्याने यातच त्यांच्या राजकीय दिशेचे उत्तर स्पष्ट होत असल्याचे सूचक वक्तव्य विखे-पाटलांनी केले. भाजपाचे लोकसभेच्या  सातारा मतदार संघाचे प्रभारी डॉ. अतुल भोसले हे अत्यंत होतकरू असून, नेतृत्व करण्याची क्षमता असल्याने त्यांनी कराडमधून नेतृत्व करावे. त्यांना भविष्यात मोठे करू असे मंत्री विखे-पाटील म्हणाले.

Story img Loader