सांगली: कांदा निर्यात शुल्कातून जमा होणारा पैसा शेतकर्‍याला मिळावा असे मत आमदार बच्चू कडू यांनी गुरूवारी सांगलीत माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

दिव्यांग मेळाव्यासाठी आ. कडू आज सांगलीत आले होते. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना आ. कडू म्हणाले, देशांतर्गत कांदा दर आटोययात ठेवण्यासाठी केंद्र शासनाने कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लागू केले आहे. या निर्यात शुल्काच्या माध्यमातून मिळणारे पैसे कांदा उत्पादक शेतकर्‍यांना मिळाले पाहिजेत अशी आपली भूमिका आहे.

bmc impose waste management charges in Mumbai
मुंबईत कचऱ्यावर साडेसात हजारांपर्यंत शुल्क; खर्च वाढल्याने पालिकेकडून प्रस्ताव
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
hingoli bogus applications for crop insurance
हिंगोलीतही १८१४ बोगस पीक विमा अर्ज आले समोर; बेचीराख, शासकीय जमिनीवरही काढला विमा
Will Meghe Medical Group be taken over by Adani
मेघे वैद्यकीय समूह अदानी टेक ओव्हर करणार? नेमके काय घडले…
Despite mla Sudhakar Adbales letter tourists are being cheated with high fees in Tadoba Reserve
शिक्षक आमदाराच्या पत्रानंतरही ताडोबात पर्यटकांकडून अतिरिक्त शुल्क आकारले
Bogus crop insurance of Rs 65 crore taken in Parbhani MP Sanjay Jadhav demands registration of case
परभणीत ६५ कोटीचा बोगस पीक विमा उचलला, गुन्हा दाखल करण्याची खासदार जाधव यांची मागणी
property dispute, Sumit Wankhade, Wardha SP, family
VIDEO : हे काय? डीआयजी तत्काळ हजर आणि दोन शिपाई निलंबित, ठाणेदार बदलीवर…
Vasai Virar Municipal Solid Waste Management Project marathi news
‘पैसे नाहीत, असे कसे म्हणता?’, महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
व्हिडिओ सौजन्य – लोकसत्ता टीम

हेही वाचा… राज ठाकरे महायुतीत सामील होणार? ‘या’ मनसे नेत्याचं नाव घेत रामदास आठवलेंचं सूचक वक्तव्य

आतापर्यंत काही सरकारे कांदा दरावरून पडली. कांदा खाणार्‍यांनी सरकारे पाडली. आता मात्र कांदा पिकवणारेही सरकार पाडू शकतात. खाणार्‍यांना कांदा रास्त दरात जर द्यायचाच असेल तर सरकारने त्याचे वितरण स्वस्त धान्य दुकानातून करावे. जर कांदा महाग वाटत असेल तर खाणार्‍यांनी कांदा न खाता लसूण, मुळा याचा वापर करावा.

हेही वाचा… “रोहित पवारांना अजित पवारांची जागा घ्यायचीय”, हसन मुश्रीफ यांचं मोठं विधान

कांद्याचे भाव कमी झाल्यावर सरकार हस्तक्षेप का करत नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कांदा दर नियंत्रणासाठी सरकारने ४० टक्के निर्यात शुल्क लागू केले आहे. कांदा निर्यातीमधून जो पैसा सरकारकडे जमा होईल तो पैसा कांदा उत्पादकांपर्यंत पोहचला पाहिजे. कुठले ही सरकार असले तरी धोरण बदलले जात नाही. अगोदर खाणार्‍यांचाच सरकारकडून विचार केला जातो. गेली ७५ वर्षे हे चालले आहे. सरकार कोणाचे याचा विचार आपण करत नाही तर एक लोकप्रतिनिधी म्हणून सामान्य लोकांच्या भावना मांडणे हे माझे कर्तव्य आहे असेही ते म्हणाले.

Story img Loader