मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता समस्त मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. मनोज जरांगे पाटलांनी आमदार खासदारांनाही या आंदोलनात उतरण्याचं आवाहन केलं आहे. आमदार खासदारांनी त्यांच्या अधिकारातून आरक्षणाची मागणी लावून धरण्याचं आवाहन जरांगेंनी केलं होतं. त्यानुसार, अनेक मराठा समाजातील नेते मुंबईत दाखल झाले आहेत. याबाबत आज मनोज जरांगेंनी भाष्य केलं आहे. उपोषणाचा आजचा सातवा दिवस असून मुख्यमंत्र्यांनी आज त्यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेतून मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी संवाद साधला.

मनोज जरांगे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर फोनवर आरक्षणावरच चर्चा झाली. दुसरी कुठलीही चर्चा झालेली नाही. आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं की, नोंदीनुसार आरक्षण घ्यायला आम्ही तयार नाही. त्या समितीचा प्रथम अहवाल स्वीकारून महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय त्यांनी घ्यावा. त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावं.

Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
What Pankaja Munde Said About Manoj Jarange?
Pankaja Munde : पंकजा मुंडे म्हणाल्या, “…तर मी मनोज जरांगेंना उपोषण स्थळी भेटेन”
BJP MP Jagdambika Pal
Waqf Board Bill : ‘अध्यक्ष फोनवर कोणाशी तरी बोलले आणि…’, निलंबित वक्फ संयुक्त संसदीय समितीच्या सदस्यांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र
What Varsha Gaikwad Said?
Varsha Gaikwad : “कुर्ला भागातील मदर डेअरीची जमीन गौतम अदाणींच्या घशात…”; खासदार वर्षा गायकवाड यांचा आरोप
State Sports Minister Datta Bharane reaction on sharad pawar and ajit pawar coming togather
“शरद पवार, अजित पवार एकत्र आले तर…”, दत्ता भरणेंच्या वक्तव्याची चर्चा
Ajit Pawar avoided to sitting next to sharad pawar
Ajit Pawar : शरद पवारांच्या बाजूला बसणं का टाळलं? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “माझा आवाज…”
Marathi actor saurabh gokhale
“मराठी हॉटेल मालकांचे परप्रांतीय वेटर, मॅनेजर…”; मराठी अभिनेता पोस्ट करत म्हणाला, “बेताल, बेलगाम…”

हेही वाचा >> “तातडीने विशेष अधिवेशन बोलवा आणि…”, मनोज जरांगेंची सरकारला विनंती; म्हणाले, “अर्धवट आरक्षण…”

पुढे जरांगे म्हणाले की, मी सर्व आमदार खासदारांना आवाहन केलं होतं की तुम्ही सगळे मुंबईत आणि तिथं आवाज उठवा. गोर-गरीब लेकांच्या पाठीशी उभे राहा. एकही मराठा तुम्हाला विसरणार नाही. पण मागणी करताना महाराष्ट्राची करा (सरसकट मराठा प्रमाणपत्र), हे त्यांना सांगितलं होतं. बऱ्याच प्रमाणात आता आमदार घरी नाहीत. सगळे बहुतेक मुंबईत गेलेले आहेत. मराठा समाजासाठी काम करत आहेत. मराठा समाज त्यांचं योगदान विसरणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.

हेही वाचा >> मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलणं टाळल्याच्या चर्चा, उपोषणाच्या सातव्या दिवशी फोन कॉल, मनोज जरांगे म्हणाले…

मराठा समाज तुम्हाला कधीच विसरणार नाही

“परंतु, आमदार -खासदार राजीनामा का देत आहेत हे कळत नाही. राजीनामा देण्यामागचा फायदा-तोटा मला कळत नाही. पण मी सर्व आमदार-खासदारांना सांगतो की तुम्ही मुंबईतच थांबा. आरक्षण मिळाल्याशिवाय यांचा पिच्छा सोडू नका. आम्ही काय इथून हटत नाही. सर्व आमदार-खासदार, माजी मंत्र्यांनी, नेत्यांनी प्रचंड मोठा गट तयार करावा. मुंबई सोडायची नाही. मंत्रायल आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची दारं सोडायची नाहीत. त्यांचे पाय पकडून त्यांच्या मागे लागायचं. सरकारला अधिवेशन घेण्यासाठी मराठा आरक्षणाचा विषय लावून धरा. मराठा समाज यांना कधीच विसरणार नाही असा शब्द देतो”, असं आश्वासनही मनोज जरांगेंनी दिलं.

Story img Loader