देशात लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. आता ४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्याआधी १ जून रोजी एक्झिट पोलचा अंदाज समोर आला आहे. या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, देशात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार येणार असल्याची शक्यता आहे. भाजपाप्रणित एनडीएने ३५० चा आकडा पार केल्याचं एक्झिट पोलच्या आकडेवारीत दिसत आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनी देशात इंडिया आघाडीचं सरकार येणार असल्याचा दावा केला आहे. अशातच अपक्ष आमदार रवी राणा यांनी मोठं विधान केलं आहे. ‘देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर १५ दिवसांत उद्धव ठाकरे त्यांच्याबरोबर दिसतील’, असं वक्तव्य रवी राणा यांनी केलं. ते टिव्ही ९ मराठीशी बोलत होते.

रवी राणा काय म्हणाले?

“मी आपल्याला सांगतो की, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलले आहेत. मात्र, आता मी जबाबदारीने सांगतो की, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान म्हणून विराजमान झाल्यानंतर १५ दिवसांमध्ये उद्धव ठाकरे हे मोदी सरकारमध्ये असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर ते दिसतील. कारण येणारा काळ हा नरेंद्र मोदी यांचा आहे. देशाचं भविष्य उज्वल करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गरज आहे”, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे.

pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
amol mitkari on tanaji sawant
Amol Mitkari : अजित पवार गटाबाबत केलेल्या विधानावरून अमोल मिटकरींचा मंत्री तानाजी सावंतांना टोला; म्हणाले, “जे खेकड्यामुळे धरण फुटले म्हणू शकतात, ते…”
Minister Dharmarao Baba Atram challenge to Anil Deshmukh Nagpur
अनिल देशमुखांना मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे आव्हान, म्हणाले ” त्यांनी माझ्या विरूद्ध लढावे”
Kailash Vijayvargiya on civil war
Kailash Vijayvargiya: ‘३० वर्षांनंतर गृहयुद्ध होणार’, भाजपा मंत्र्यांचे विधान; काँग्रेस पलटवार करताना म्हणाले, ‘मग महसत्ता कसं होणार?’
Loksatta karan rajkaran Deputy Chief Minister Ajit Pawar refused to answer whether he would reunite with Sharad Pawar group
शरद पवारांशी हातमिळवणी बाबत अजित पवारांचे मौन
minister hasan mushrif
नितेश राणे यांच्या विधानाकडे देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने पाहावे, मंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी
Narendra Modi
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं कोलकात्यातील बलात्कार घटनेच्या पार्श्वभूमीवर मोठं विधान; लाल किल्ल्यावरून भाषणात म्हणाले, “काही चिंताजनक गोष्टी…”

हेही वाचा : पक्षप्रवेशाची इच्छा व्यक्त करणाऱ्या एकनाथ खडसेंच्या भाजपालाच कानपिचक्या; म्हणाले, “फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका…”!

संजय शिरसाट काय म्हणाले?

“आमदार रवी राणा यांनी मोदी सत्तेत आल्यानंतर उद्धव ठाकरे १५ दिवसांत त्यांच्याबरोबर येतील, असा मोठा दावा केला. त्यावर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी भाष्य केलं आहे. शिरसाट म्हणाले, “या गोष्टी जर तरच्या आहेत. त्यांनी (उद्धव ठाकरे यांनी) यावं की नाही, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. तसंच त्यांना घ्यावं की नाही हे ठरवणारे उद्धव ठाकरे नाही तर ते नरेंद्र मोदी, अमित शाह, एकनाथ शिंदे आहेत”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

यावेळी संजय शिरसाट यांना पडद्यामागे काही हालचाली सुरु आहेत का?, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “आता पडद्यामागे हालचाली नाही तर आता पडदा बाजूला गेलेला आहे. आता हालचाली या समोर व्हायला लागल्या आहेत. हे सर्वसामान्य माणसांनाही माहिती आहे. त्यांचे (उद्धव ठाकरे यांचे) प्रयत्न सुरू आहेत. त्यांना महाविकास आघाडीमध्ये राहायचं नाही हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे उद्या ते आले तर आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही”, असं सूचक विधान संजय शिरसाट यांनीही यावेळी केलं.