वाई:आज विधानसभेत मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला परंतु सरकारने घेतलेला हा निर्णय योग्य कसा आहे हे मराठा समाजाला आणि जनतेला सांगण्याची जबाबदारी सरकारची आहे. आज जो ठराव मंजूर झाला हा समाजाने स्वीकारला की नाही यावर समाजाचे मत येण्यापूर्वीच  श्रेयवादात जल्लोष करण्यात आला. मग हे श्रेय मुख्यमंत्र्यांचे की सरकारचे हे जनतेला कळायला हवे असे मत आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा >>> लोकसभा स्वतंत्रपणे लढणार – राजू शेट्टी; शरद पवार कोल्हापुरात असताना घोषणा

eknath shinde anand dighes film became super hit and our Vidhansabha picture also became super hit Now we want to make third film
खासदार फुटीच्या चर्चेवर एकनाथ शिंदे यांची टोलेबाजी
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Chandrakant Patil demand to Deputy Chief Minister Eknath Shinde regarding the traffic congestion problem Pune news
अजित पवारांपाठोपाठ चंद्रकांतदादा भेटले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली ही मागणी !
MLA Jitendra Awhad reaction after badlapur rape case accused akshay shindes parents withdraw the case
आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, “…तर अक्षय शिंदेचे भूत तुमच्या मानगुटीवर बसणार, हे नक्की”
Shiv Sena mouthpiece claims tension between Fadnavis and Shinde
एसटी महामंडळातील नियुक्तीवरून मुख्यमंत्र्यांची शिंदे गटावर कुरघोडी
Eknath Shinde on Sanjay Raut
“वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये रेड्याची मंतरलेली शिंगं…”, संजय राऊतांच्या दाव्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
Sanjay Shirsat On Shivsena
Sanjay Shirsat : एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, ‘संधी मिळाल्यास दोन्ही शिवसेना…’
SIT probes conspiracy against Devendra Fadnavis Eknath Shinde Mumbai news
फडणवीस, शिंदेंविरोधातील कारस्थानाची ‘एसआयटी’ चौकशी; खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे प्रकरण

मराठा आरक्षण विधेयक एकमताने विधानसभेत मंजूर झाले यावर आमदार शशिकांत यांनी लोकसत्ता’ला प्रतिक्रिया दिली. हा ठराव मंजूर झाल्यानंतर सरकारने जल्लोष केला. एखादा ठराव मंजूर झाल्यानंतर आजपर्यंत असे कधी घडलेले नव्हते.आज विधानसभेत प्रमुख नेत्यांनी या ठरावावर फक्त मुख्यमंत्री बोलतील आणि त्यानंतर हा ठराव  मंजूर करायचा आहे असे ठरले होते. त्यामुळे विधिमंडळात या विषयावर चर्चा झाली नाही. २०१४ आणि २०१८ या वर्षात विधिमंडळात अशा प्रकारचा ठराव मंजूर झाला आहे. मग आजच्या ठरावात वेगळे काय आहे याची माहिती सरकारला समाजाला द्यावी लागेल. जरांगे पाटील यांनी जे काही उपोषण किंवा आंदोलन सुरू केलं आहे, यावर सरकारची भूमिका काय आहे ही सुद्धा सरकारला मांडावे लागेल. प्रस्तावावर चर्चा करून याबाबत योग्य ते बदल करता आले असते. मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले आहे आणि हे न्यायालयापासून सर्व पातळ्यांवर टिकले पाहिजे हे महत्त्वाचं आहे. या आरक्षणाबाबत सरकारला मराठा समाजाला विश्वासात घ्यावे लागेल आणि त्यांना सर्व बाबी सांगाव्या लागतील. जर हे आरक्षण न्यायालयात टिकले नाही तर सरकार वरचा समाजाचा विश्वास उडेल आणि पुन्हा राज्यात समाज आणि सरकार असा संघर्ष उभा राहील असे शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

Story img Loader