मागील काही दिवसांमध्ये राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. शिवसेना पक्षात उभी फूट पडली. सध्या शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समर्थक असे सरळ दोन गट पडले आहेत. असे असताना मनसे पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेनेतील पक्षफुटी आणि त्याची कारणं यावर सविस्तर भाष्य केलं आहे. शिवसेना पक्षफुटीला कुटुंबातीलच लोक जबाबदार आहेत, असे भाष्य राज ठाकरे यांनी केले आहे.

हेही वाचा >>> शिवसेना फुटीला भाजपा जबाबदार की शरद पवार? राज ठाकरे स्पष्टच बोलले, म्हणाले…

New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
ubt loyal former corporator rajul patel join shinde shiv sena
राजूल पटेल यांचा ठाकरेंना जय महाराष्ट्र; विभागातील राजकारणाला कंटाळून निर्णय
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”
Kirit Somaiya criticizes Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे सध्या तडफडत आहेत कारण… किरीट सोमय्यांनी थेट…
Saamana critiques Shiv Sena leadership on Balasaheb Thackeray’s birth anniversary, targeting the Shinde faction.
“शिवसेनारूपी कवचकुंडले मोडून ती तोतया शिंदेंच्या हाती सोपवली”, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिनी ठाकरे गटाची टीका
Shiv Sena Thackeray factions Ratnagiri taluka chief Bandya Salvi resigns
रत्नागिरीत राजकीय घडामोडीना वेग; शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का देत तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांचा राजीनामा

राज ठाकरे यांनी झी २४ तास या मराठी वृत्तवाहिनीला मुलाख दिली. या मुलाखतीत बोलताना ” शिवसेना का फुटली यावर लोकांना थेट आरोप करता येत नाहीत. त्यामुळे संजय राऊतांसारखे एक माध्यम निवडायचे आणि झोडायचे. आपल्या मनातला राग काढायचा असे केले जाते. मात्र शिवसेना विखुरण्याला कुंटुबातीलच लोक जबाबदार आहेत. राजकारण तसेच इतर व्यवहारामध्ये त्यांची दखल जास्त प्रमाणात व्हायला लागली तेव्हापासूनच या गोष्टी घडत गेल्या. मिही त्याच कारणामुळे बाहेर पडलो. आता बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे तसेच इतर आमदारांना विचारा तेही हेच सांगतील,” असे राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >>>“…म्हणून पहिल्या दिवसापासून मनाशी खूणगाठ बांधली,” देवेंद्र फडणवीसांनी सांगितले सत्तापरिवर्तनामागचे नेमके कारण

“चांगल्या काळामध्ये सत्तेवर यायचं, संपत्ती गोळा करायची. वाईट काळ आला की बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर लोकांना भावनिक करायचं, असे उद्योग सुरु आहेत. असुरक्षित माणसं कधीही प्रगती करु शकत नाहीत. ते याच्या खांद्यावर त्याच्या खांद्यावर प्रवास करत असतात. कोणी उतरवलं की त्यांना त्याची जाणीव होते,” असा टोला राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना त्यांचे नाव न घेता लगावला.

Story img Loader