झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर ईडीकडून कारवाई केली जात आहे. तसेच महाराष्ट्र, दिल्ली, बिहार आणि इतर राज्यात विरोधी पक्षात असलेल्या नेत्यांमागे केंद्रीय तपास यंत्रणा लागलेल्या आहेत. हे राजकारण पुढे जाऊन सध्याचे सत्ताधारी असलेल्या भाजपाला परवडणार नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलत असताना राज ठाकरे यांनी ईडीच्या कारवाईवर भाष्य केले. “देशभरात केंद्रीय तपास यंत्रणाकडून ज्या कारवाया सुरू आहेत. ते पाहता हे राजकारण भविष्यात भाजपाला परवडणार नाही, असे दिसते. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीच आलेलं नसतं. उद्या जेव्हा सत्ताबदल होईल, तेव्हा पलीकडच्या बाजूनेही दामदुपटीने कारवाई होईल, तेव्हा काय कराल?”, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. “इंदिरा गांधींच्या काळातही असंच झालं होतं, पण त्या काळात झालं म्हणून आपणही तेच करायचं, हे योग्य नाही”, असेही स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी दिले.

chandrashekhar Bawankules warning to the rebels expulsion of the former MLA from the party
बावनकुळेंचा बंडखोरांना इशारा, माजी आमदाराची पक्षातून हकालपट्टी
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Arvind Kejriwal
हरियाणातील आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आजच्या निकालातून…”
Hitendra Thakur, Rajiv Patil, Hitendra Thakur latest news,
प्रत्येकाला स्वत:ची मते असतात – हितेंद्र ठाकूर; राजीव पाटील पक्षांतराच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया
Narendra Modi statement that the people of Kashmir are waiting for a terror free government print politics news
काश्मिरी जनतेला दहशतवादमुक्त सरकारची प्रतीक्षा – मोदी
Sharad Pawars big statement about increasing oppression of women
महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…
BJP leaders Demand to Give a chance to the old workers while pampering the new ones
नव्यांचे लाड करताना जुन्या कार्यकर्त्यांनाही संधी द्या! भाजप नेत्यांची नेतृत्वाकडे मागणी
Sharad Pawar criticism of the rulers over the economic power in the state print politics news
सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात अर्थसत्तेची मस्ती – पवार

‘जरांगे पाटील फसले की फसवले गेले?’, राजकीय अजेंड्याबाबत राज ठाकरे स्पष्टच म्हणाले…

टोलचा पैसा कुणाच्या खिशात जातो

नाशिक येथील पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी टोलनाक्याच्या बाबतीत पुन्हा एकदा भूमिका मांडली. ते म्हणाले, माझा टोलला विरोध नाही. पण टोलवर जी रोकड जमा होते, त्याला विरोध आहे. टोलमधून किती गाड्या गेल्या, किती टोल वसूल झाला, त्यातून सरकारला किती पैसा गेला आणि कंत्राटदाराच्या खिशात किती पैसे गेले? याच्यात कोणतीही पारदर्शकता नाही. जगभरात टोल आहे. पण आपल्याकडे विषय टोलवसुलीचा आहे. मुंबई-पुणे महामार्गावर गेले कित्येक वर्ष टोल वसूल केला जात आहे, या वर्षात अद्याप पैसे वसूल झाले की नाही? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

‘यावेळी पंतप्रधान कोण व्हावा?’, मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले…

टोलवरील पैसा हा कंत्राटदाराच्या खिशात जातो. तिथून तो राजकीय पक्षांच्या फंडात जातो, अशा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला. मलाही कंत्राटदारांकडून ऑफर आल्या होत्या. पण मी त्या स्वीकारल्या नाहीत.

गोडसे, गांधी गेले.. आताच्या प्रश्नावर बोला

रणजीत सावरकर यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत केलेल्या वक्तव्याचा प्रश्न राज ठाकरे यांना विचारला असता त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. “जुन्या गोष्टी आपण सोडून दिल्या पाहीजेत. कुणीतरी गोडसेवर बोलायचं, मग पलीकडून नेहरू, इंदिरा गांधी यांच्यावर बोललं जाणार. त्यापेक्षा कामावर लक्ष दिलं पाहीजे. गोडसेही गेले, गांधीही गेले.. त्यांच्यावर आज बोलून उपयोग नाही. महागाई, पेट्रोल-डिझेलच्या सेसवर कुणी बोलायला तयार नाही, महाराष्ट्रातच मराठी माणसाला घर नाकारले जाते, त्यावर कुणाला बोलायला वेळ नाही. मग गेलेल्या माणसावर बोलून काय हाती लागणार आहे? असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.