मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय बदलाचे वारे वाहू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार ४० आमदारांसह भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण अजित पवारांनी प्रसारमाध्यमांसमोर येत आपण राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच काम करणार आहे, असं स्पष्टीकरण दिलं आहे. महाराष्ट्रात सत्ताबदलाची चर्चा सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.

दोन्ही बड्या नेत्यांनी अशी अचानक भेट घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी स्वत: प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. एकनाथ शिंदेंबरोबरच्या बैठकीत नेमकी चर्चा काय झाली? याचा खुलासा राज ठाकरे यांनी केला.

aditya thackeray devendra fadnavis
“…तर इगो कुणाचा दुखावतोय, हे कळेल”; देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ आरोपाला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर!
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
What Supriya Sule Said About Rohit Pawar ?
Supriya Sule : “रोहित पवार जर मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी शरद पवारांचा वारसा..”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य चर्चेत
Tirupati Prasad Controversy
Prakash Raj: ‘तुझ्या दिल्लीतील मित्रांमुळे धार्मिक तणाव’, तिरुपती प्रसाद वादावर अभिनेते प्रकाश राज यांची पवन कल्याण यांच्यावर टीका
cm Eknath shinde visit Solapur marathi news
सकल मराठा समाज – मराठा क्रांती मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावरून आमने-सामने
jayant patil appeal bachchu kadu
Jayant Patil : राज्यात तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरु असतानाच जयंत पाटलांचे बच्चू कडूंना आवाहन; म्हणाले…
Ramdas athawale, Dahanu,
महायुतीमध्ये मी असताना राज ठाकरेंची गरज काय – रामदास आठवले
prashant kishor on bihar liquor ban
“बिहारमध्ये सत्ता आल्यास, तासाभरात दारुबंदी उठवू”; जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष प्रशांत किशोर यांची घोषणा

हेही वाचा- “काहीही झालं तरी राजकीय भूकंप होणारच…”, अंबादास दानवेंचं मोठं विधान!

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे म्हणाले, “आज मुख्यमंत्र्यांची आणि माझी भेट झाली. मुंबईतील बरेच विषय प्रलंबित होते. त्यासंदर्भातील शिष्टमंडळं मी त्याठिकाणी बोलावली होती. यातील पहिला विषय असा होता की, वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प. या चाळीत राहणाऱ्या लोकांनाच माहीत नाही की, तिथे काय होणार आहे? तेथील रहिवाशांना किती स्क्वेअर फुटांची घरं मिळणार आहेत. तो परिसर खूप मोठा आहे, तिथे नेमकं काय होणार आहे? तिथे शाळा, दवाखाने, मैदाने अशा सुविधा उभारल्या जाणार आहेत का? यातील कोणत्याही गोष्टीची त्यांना कल्पना नसल्याने संबंधित अधिकारी या बैठकीत हजर होते. ते लवकरच याबाबतचं सादरीकरण बीडीडी चाळीतील रहिवाशांसमोर करणार आहेत. यामुळे बीडीडी चाळीतील लोकांना एकप्रकारे स्पष्टता येईल.”

हेही वाचा- “आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नाही”, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान!

“सिडको संदर्भातील घरांच्या किमती २२ लाखांवरून ३५ लाखांवर नेल्या आहेत. या किमती पुन्हा २२ लाखांवर कशा आणता येतील? याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. शिवाय पोलिसांच्या घरासंदर्भातही बैठकीत चर्चा झाली. सगळ्या प्रकरणात सकारात्मक प्रतिसाद मिळालाच पाहिजे, असं मी त्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे,” अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली.