केंद्रात एनडीएच सरकार स्थापन झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले. त्या निर्णयामध्ये पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराला मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने आता वाढवण बंदरासाठी तब्बल ७६ हजार २०० कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भातील माहिती दिली.

महाराष्ट्रासाठी वाढवण बंदराचा प्रकल्प हा महत्वाचा प्रकल्प मानला जातो. वाढवण बंदराचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हे बंदर जगातील पहिल्या १० बंदरांपैकी एक असणार आहे. दरम्यान, या वाढवण बंदराच्या प्रकल्पला मच्छीमार, स्थानिक शेतकरी तसेच विविध पर्यावरणवादी संस्थांनी कडाडून विरोध केला होता. तसेच विरोध असला तरीही बंदर उभे राहील, असा आशावाद काहींना कायम होता. अखेर या प्रकल्पाला आता केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

interfaith couple legal protection by maharashtra government
आता बिनधास्त करा प्रेमविवाह! ,सरकार देणार ‘सेफ हाऊस’
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
interest free loan, Center , states, benefit ,
केंद्राकडून राज्यांना १.११ लाख कोटींचे बिनव्याजी कर्ज, २०२३-२४ मध्ये सर्वाधिक फायदा कोणत्या राज्यांना जाणून घ्या… 
pune city real estate projects Housing projects
सरकारच्या एका चुकीच्या निर्णयामुळे हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांना खो बसतो तेव्हा…
Mumbais Water for All policy provided 7868 new water connections by December 2024
सर्वांसाठी पाणी धोरणाअंतर्गत १५ हजार अर्ज, ७८६८ जोडण्या दिल्या
BMC Budget 2025 Latest Updates in Marathi, mumbai municipal corporation budget update withdraw of reserve fund charges on garbage
BMC Budget 2025 : पालिका राखीव निधीतून १६ हजार कोटी काढणार? वाढत्या खर्चामुळे महसूल वाढीसाठी धडपड, कचरा शुल्कही लावणार
Expedite work of houses under PMAY in Maha says cm fadnavis
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या कामांना गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
Budget 2025 IIT IIM MBBS seats
Budget 2025 : IIT च्या ६,५०० व वैद्यकीय महाविद्यालयांतील ७५,००० जागा वाढवणार! अर्थमंत्र्यांची घोषणा

हेही वाचा : २५० कोटी खर्चाच्या सोलापूर एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यास मान्यता

या संदर्बात बोलताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, “महाराष्ट्रासाठी वाढवण बंदराचा प्रकल्प हा गेमचेंजर प्रकल्प आहे. आता गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा हा प्रकल्प आता मार्गी लागणार आहे. देशातील सर्व बंदरांच्या क्षमतेपेक्षा जास्त क्षमतेच हे वाढवण बंदर प्रकल्प असणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून जवळपास लाखो लोकांना रोजगार मिळेल”, असं मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.

दरम्यान, वाढवण बंदरामुळे देशाची वार्षिक मालवाहतूक क्षणता वाढणार आहे. तसेच या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण होतील. वाढवण बंदर हे ‘लँडलॉर्ड मॉडेल’च्या धर्तीवर विकसित केलं जाणार आहे. वाढवण बंदरामुळे देशाच्या आयात आणि निर्यातीला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. जवळपास ९० टक्के कंटेनर्सची वाहतूक ही वाढवण बंदरातून होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, या बंदराची निर्मिती महाराष्ट्र मेरी टाईम पोर्ट्स आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटीच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणार असून हे वाढवण बंदर २०२७ पर्यंत तयार होईल, अशी अपेक्षा आहे.

Story img Loader