केंद्रात एनडीएच सरकार स्थापन झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले. त्या निर्णयामध्ये पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराला मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने आता वाढवण बंदरासाठी तब्बल ७६ हजार २०० कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भातील माहिती दिली.

महाराष्ट्रासाठी वाढवण बंदराचा प्रकल्प हा महत्वाचा प्रकल्प मानला जातो. वाढवण बंदराचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हे बंदर जगातील पहिल्या १० बंदरांपैकी एक असणार आहे. दरम्यान, या वाढवण बंदराच्या प्रकल्पला मच्छीमार, स्थानिक शेतकरी तसेच विविध पर्यावरणवादी संस्थांनी कडाडून विरोध केला होता. तसेच विरोध असला तरीही बंदर उभे राहील, असा आशावाद काहींना कायम होता. अखेर या प्रकल्पाला आता केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

Bhoomipujan of Naina projects tomorrow by Prime Minister
कृषी क्षेत्राबाबत मोदी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
maharashtra facing financial pressure due to new schemes
नवीन योजनांचा राज्याच्या तिजोरीवर भार ;वित्त विभागाच्या नकारानंतरही १,७०० कोटी रुपयांच्या क्रीडा संकुलांना मंजुरी
Refund if higher salary demand guarantee from ST employees
मुंबई : जास्त वेतन आल्यास परत द्या, एसटी कर्मचाऱ्यांकडून हमीची मागणी
Kohinoor LT Foods share prices
कोहिनूर, एलटी फूड्सचे समभाग तेजीत, केंद्र सरकारने बासमती तांदळावरील निर्यात मूल्य हटविल्याचा फायदा
Administrative Officer of Sassoon Hospital along with 16 employees embezzled Rs 4 Crore 18 Lakhs Pune news
‘ससून’चा पैसा सगळे मिळून खाऊ! रुग्णालयातील ४ कोटी रुपयांना असे फुटले पाय…
ajit pawar cancel tender of chanakya excellence center concept of bjp minister mangal prabhat lodha
भाजप मंत्र्याच्या प्रकल्पाला अजितदादांचा खो; चाणक्य केंद्रा’च्या आरेखनात बदलाची सूचना, नावालाही आक्षेप
mumbai mhada noticed that nashik builder divide plots to avoid mhada s 20 percent scheme
मुंबई : योजना टाळण्यासाठी भूखंडाचे तुकडे,२० टक्के सर्वसमावेश योजनेत नाशिकमधील विकासकांची शक्कल; म्हाडाकडून दखल

हेही वाचा : २५० कोटी खर्चाच्या सोलापूर एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यास मान्यता

या संदर्बात बोलताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, “महाराष्ट्रासाठी वाढवण बंदराचा प्रकल्प हा गेमचेंजर प्रकल्प आहे. आता गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा हा प्रकल्प आता मार्गी लागणार आहे. देशातील सर्व बंदरांच्या क्षमतेपेक्षा जास्त क्षमतेच हे वाढवण बंदर प्रकल्प असणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून जवळपास लाखो लोकांना रोजगार मिळेल”, असं मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.

दरम्यान, वाढवण बंदरामुळे देशाची वार्षिक मालवाहतूक क्षणता वाढणार आहे. तसेच या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण होतील. वाढवण बंदर हे ‘लँडलॉर्ड मॉडेल’च्या धर्तीवर विकसित केलं जाणार आहे. वाढवण बंदरामुळे देशाच्या आयात आणि निर्यातीला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. जवळपास ९० टक्के कंटेनर्सची वाहतूक ही वाढवण बंदरातून होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, या बंदराची निर्मिती महाराष्ट्र मेरी टाईम पोर्ट्स आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटीच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणार असून हे वाढवण बंदर २०२७ पर्यंत तयार होईल, अशी अपेक्षा आहे.