देशातील विरोधी पक्षांची काल संयुक्त बैठक बंगळुरूत पार पडली. या बैठकीत २६ पक्षांच्या आघाडीला नाव देण्यात आले. INDIA असं हे नाव असून Indian National Development Inclusive Alliance असा त्याचा पूर्ण अर्थ होतो. मात्र, INDIA वरून भाजपाने टीका केली आहे. हा भारताचा अपमान असल्याचं भाजपानं म्हटलं आहे. यावरून संजय राऊतांनी भाजपावर पलटवार केला आहे.

“नऊ वर्षांत एनडीए आठवली नाही. मित्र पक्ष आठवले नाहीत. परंतु, आम्ही एकत्र आल्यावर त्यांना एनडीए आठवली. याबद्दल एनडीएच्या लोकांनी मोदींचा सत्कारच केला पाहिजे. ही भीती आहे. आम्ही एकत्र आलो आहोत, हा इंडिया आहे. फक्त मोदींनाच वोट फॉर इंडिया बोलण्याचा अधिकार नाही. मोदी इज इंडिया, हा इंडियाचा अपमान नाही का? वारंवार मोदींनी आपल्या भाषणात आम्ही म्हणजे इंडिया आहोत असं म्हटलंय, याचा अर्थ काय होतो? मोदी म्हणजे इंडिया नाही. भाजपा म्हणजे इंडिया नाही. प्रत्येक व्यक्ती हा इंडिया आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

annapoorna issue srinivasan reaction
“झालं ते विसरून पुढं जायला हवं”, ‘त्या’ व्हिडीओवरील वादावर अन्नपूर्णा हॉटेलचे संचालक श्रीनिवासन यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “ज्यांनी…”
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
vanraj andekar murder case marathi news
वनराज आंदेकर खून प्रकरणात आणखी दोघे अटकेत, आरोपींकडून आठ पिस्तुलांसह १३ काडतुसे जप्त
Vinesh Phogat slams PT Usha
Vinesh Phogat on PT Usha: “पीटी उषा यांनी गुपचूप फोटो घेतला आणि त्यानंतर राजकारण…”, विनेश फोगटचा मोठा आरोप
sam pitroda statement on rahul gandhi
VIDEO : “राहुल गांधी ‘पप्पू’ नाहीत, तर…”; सॅम पित्रोदांचे विधान चर्चेत!
Devendra Fadnavis Trolled For His Statement
Devendra Fadnavis : “छत्रपती शिवरायांनी सूरत लुटलं नाही, काँग्रेसने…”, देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरुन ट्रोलिंग, कोण काय म्हणालं?
kangana Ranaut and simranjit singh mann
Kangana Ranaut : “कंगना रणौत यांना बलात्काराचा खूप अनुभव”, माजी खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
vijay wadettiwar on deepak kesarkar
Vijay Wadettiwar : “शिवरायांचा पुतळा अपघाताने कोसळला” म्हणणाऱ्या दीपक केसरकरांवर विजय वडेट्टीवारांचं टीकास्र; म्हणाले, “अपघाताने आलेल्या सरकारचं…”

हेही वाचा >> “मी गांधींचा भक्त, वाईट पाहत नाही, पण…”; किरीट सोमय्याप्रकरणी संजय राऊतांचा हल्लाबोल

भ्रष्टाचारी लोकांची ही आघाडी असल्याची टीकाही भाजपाकडून करण्यात आली आहे. यावरून संजय राऊत म्हणाले की, “७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा तुमच्या बाजूला उभा आहे. पाठिमागे इक्बाल मिरची उभा आहे. हे ढोंग बंद करा. हे ढोंग लोकांना कळतंय. तुम्ही म्हणजेच इंडिया हे आम्ही मानत नाही. हे नागरिक म्हणजे इंडिया आहे. आम्ही २६ पक्ष एकत्र आल्यावर तुमच्या एनडीएचं कमळ फुलायला लागलं. आम्ही भारत म्हणून, देश म्हणून एकत्र आल्यावर तुम्हाला एनडीए आठवली. हा इंडिया तुमच्या हुकूमशाहीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. भारत जिंकणार, इंडिया जिंकणार आणि हुकूमशाहीचा पराभव होणार. हिंमत असेल तर भारताचा पराभव करून दाखवा.”

हेही वाचा >> “जैसी करनी…”; किरीट सोमय्या आक्षेपार्ह व्हिडीओप्रकरणी संजय राऊत स्पष्टच बोलले

आमच्यावर संस्कार, वाईट पाहत नाही- संजय राऊत

किरीट सोमय्या प्रकरणी आज संजय राऊतांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, “मी गांधींजीचा भक्त आहे. मी वाईट पाहत नाही. नाही मी वाईट ऐकत. परंतु, वाईटाचा अंत नक्कीच करतो.”

“आमच्यावर संस्कार आहेत. या राज्याची परंपरा आहे. बाळासाहेबांनी सांगितलं आहे की कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका. त्यांना पत्नी आहे, मुलं आहेत. त्यांनी कोणतं पाप केलं असेल तर त्यांना भोगावं लागेल. मी का बोलू?” असंही संजय राऊत म्हणाले.