पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावरच राष्ट्रवादी पक्षात बंडखोरी झाल्याने सत्ताधाऱ्यांसमोरील विरोधकांचं आव्हान गळून पडलं आहे. राज्याचे विरोधी पक्षनेतेच सत्तेत सहभागी झाल्याने यंदाचे पावसाळी अधिवेशन विरोधकांच्या आक्रमतेशिवाय होणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, शरद पवार गटाकडे १० ते १५ आमदार, ठाकरे गटाकडे १५ आणि काँग्रेसच्या ४५ आमदारांचं संख्याबळ असलं तरीही सत्ताधाऱ्यांना नमवण्यासाठी विरोधकांची दमछाक होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे.

“सध्या जे काही घडलं आहे त्या पार्श्वभूमीवर सर्वच विषय आज चर्चेत घेतले जातील”, असं अशोक चव्हाण म्हणाले. पावसाळी अधिवेशन उद्यापासून (१७ जुलै) सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांची आज बैठक होणार आहे. या बैठकीबाबत अशोक चव्हाणांनी ही प्रतिक्रिया दिली.

Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
Narendra Modi on foreign meddling
Narendra Modi : “गेल्या १० वर्षांतील हे पहिलेच अधिवेशन, ज्यात…”; विदेशी हस्तक्षेपावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला!
Image Of Ajit Pawar
Ajit Pawar : “मी काही साधू संत नाही”, बीडमधून अजित पवार यांचा कोणाला इशारा?
Ahead of municipal elections Congress office bearers are leaving party in Navi Mumbai
आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षफुटीचे सत्र सुरू, माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांची काँग्रेसला सोडचिट्ठी
Abhijeet Chavan
“मेल्या, चप्पल तरी काढ”, नेटकऱ्याच्या कमेंटवर अभिजीत चव्हाण यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “तीच तर…”
BJP leader manoj tiwari interview
ते ‘रेवड्या’ वाटतात, आम्ही ‘मोफत’ देतो; भाजपा नेते मनोज तिवारींची ‘आप’वर टीका

हेही वाचा >> “अजित पवारांनी त्यांचा पक्ष वाढवला, यात गैर काय?” निधीवाटपावरून संजय शिरसाटांचा रोखठोक प्रश्न

ते पुढे म्हणाले की, “जेवढे आता आहेत ती सर्व मंडळी प्रामाणिकपणे काम करतील. जे व्हायचं आहे ते होऊन गेले आहे. ठाकरे गट आणि शरद पवारसाहेबांसोबत जे आमदार आहेत आणि काँग्रेसचे ४५ आमदार एकत्र मिळून प्रभावी विरोधी पक्ष म्हणून सभागृहात आक्रमक होऊन काम करणार आहोत”, असं अशोक चव्हाण म्हणाले.

हेही वाचा >> “संपूर्ण विश्वाला चिंता, पण विश्वगुरू…”, संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

विरोधी पक्षावर दावा करणार का?

विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने विरोधी पक्षनेतेपदाची खुर्ची रिकामी आहे. तात्पुरती ही खुर्ची जितेंद्र आव्हाडांकडे दिली असली तरीही सभागृहातील शरद पवारांचे संख्याबळ पाहता ही खुर्ची केव्हाही जाऊ शकते. यावर काँग्रेसने दावा केला आहे. सभागृहात सर्वाधिक संख्याबळ आता काँग्रेसचे असल्याने विरोधी पक्षनेते पद काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. त्यावर अशोक चव्हाण म्हणाले की, “सर्वाधिक संख्या बळ असलेल्या एका पक्षाला विरोधी पक्षनेतेपद दिलं जातं अशी प्रथा आहे. परंतु, यावर अद्यापही काही चर्चा नाही. पक्ष जो निर्णय घेईल तो पाळला जाईल.”

Story img Loader