लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : कृष्णा खोऱ्यात असलेल्या दहा धरणांपैकी राधानगरी व पाटगाव धरणे शंभर टक्के तर अन्य आठपैकी सात धरणांतील पाणीसाठा ८० टक्क्यांहून अधिक झाला आहे. यामध्ये राज्यातील महत्त्वाच्या कोयना धरणात ८५.५९ टीएमसी जलसाठा तयार झाला आहे.

Leopard Nate area, Ratnagiri, Leopard, loksatta news,
रत्नागिरी : नाटे परिसरात दिवसाढवळ्या बिबट्याची दहशत, विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात वन विभागाला यश
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
There has increase in number of potholes in Dronagiri node of Uran during monsoon
द्रोणागिरी परिसर खड्ड्यांत; पाऊस थांबल्याने मार्गावरील धुळीच्या उधळणीने प्रवासी आणि नागरिक त्रस्त
increase in house burglaries in western Vishnunagar police station limits of Dombivli since last week
डोंबिवलीतील विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीत घरफोड्या वाढल्याने नागरिक हैराण
Traffic congestion in Radhanagar Khadakpada Kalyan West disturbs residents and students daily
कल्याणच्या राधानगरमधील दररोजच्या वाहन कोंडीने प्रवासी हैराण
Sudhir Mungantiwar, tigers, forest,
मुनगंटीवार म्हणतात, जंगलातील वाघांना स्थलांतरित करा..
article about survey of internet users in rural and urban area of india
डेटाखोरीचे जग…
leopard got stuck in a cage set up by the forest department in Girda village Buldhana | गिरडा शिवारात पुन्हा 'ट्रॅप'!सहावा बिबट अडकला पिंजऱ्यात; 'ती' अडकली, 'तो' रेंगाळला... ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता
गिरडा शिवारात पुन्हा ‘ट्रॅप’!सहावा बिबट अडकला पिंजऱ्यात; ‘ती’ अडकली, ‘तो’ रेंगाळला…

गेल्या वर्षी झालेल्या अपुऱ्या पावसामुळे उन्हाळ्याच्या अखेरीस राज्यातील सर्व धरणांतील जलसाठे हे मृतवत झाले होते. राज्यातील मोठे असलेले कोयना धरणही तळाशी गेले होते. कृष्णा खोऱ्यातून येणाऱ्या पाण्यावर साठवल्या जाणाऱ्या अलमट्टी धरणातील पाणीसाठाही यंदाच्या हंगामाच्या प्रारंभी १ जून रोजी २१.३७ टीएमसी म्हणजे केवळ १७ टक्के होता. मात्र गेल्या पंधरवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा खोऱ्यातील सर्वच धरणसाठे पुन्हा वेगाने भरू लागले आहेत. अलमट्टीचा साठा १८ जुलै रोजी ९९.३२ टीएमसी म्हणजेच ८१ टक्के झाला.

आणखी वाचा-धाराशिव : सव्वापाचशे किलो गांजा पकडला, एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

दरम्यान, पश्चिम घाटात असलेल्या धरणांपैकी राधानगरी, पाटगाव ही दोन धरणे शंभर टक्के भरली आहेत. राज्यातील महत्त्वाच्या कोयना धरणात ८५.५९ टीएमसी जलसाठा तयार झाला आहे. अन्य धरणांतील पाणीसाठा आणि कंसात साठवण क्षमता (टीएमसीमध्ये) पुढीलप्रमाणे. कोयना ८५.५९ (१०५.०५), धोम ११.३८ (१३.५०), कन्हेर ८.०६ (१०.१०), वारणा २९.२५ (३४.४०), दूधगंगा २१.९५ (२५.४०), राधानगरी ८.३६ (८.३६), तुळशी ३.२८ (३.४७), कासारी २.२६ (२.७७), पाटगाव ३.७२ (३.७२), धोम बलकवडी ३.४३ (४.०९), उरमोडी ७.७१ (९.९७), तारळी ५.०४ (५.८५), अलमट्टी ६७.६७ (१२३).

अलमट्टीतून साडेतीन लाख विसर्ग

पश्चिम घाटात पावसाची संततधार सुरू झाल्याने कृष्णा, पंचगंगा, वारणा या नदीतील पाणीपातळी वाढू लागली आहे. कोसळणारा पाऊस आणि धरणातील विसर्गामुळे सांगली, कोल्हापुरातील नद्यांना सध्या पूर आले आहेत. कोयनेतून ४२ हजार १००, धोममधून ४५३, कण्हेरमधून ४६२२, उरमोडीमधून ७५, तारळीतून ३५२६ आणि चांदोलीतून ८०९२ क्युसेकचा विसर्ग होत आहे. मुसळधार पाऊस आणि पश्चिम घाटातील धरणातून होणारा विसर्ग यामुळे सांगली, कोल्हापूरला पुराचा धोका अद्याप कायम आहे. यामुळे अलमट्टीतील विसर्ग सध्या साडेतीन लाख क्युसेक करण्यात आला आहे. यामुळे अलमट्टी धरणातील पाणीसाठा गेल्या तेरा दिवसांत ८१ टक्क्यांवरून ५५ टक्क्यांवर आणण्यात आला आहे.

आणखी वाचा-“राजकीय पक्षांचे प्रवक्ते सध्या काहीही वक्तव्य करतात”, रावसाहेब दानवेंचा रोख कुणाकडे?

सतर्कतेचा इशारा

सध्या सांगलीतील कृष्णेची पाणीपातळी ३७ फूट ७ इंचावर आली असली तरी धरणातील विसर्ग आणि पाणलोटमुक्त क्षेत्रात पडत असलेल्या पावसाने आणखी दोन फुटापर्यंत वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे, असा इशारा जलसंपदा विभागाकडून बुधवारी देण्यात आला.