सातारा: जिल्ह्यातील आणेवाडी टोल नाका येथे आज सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. पुणे येथे राजू शेट्टी यांच्या आंदोलनासाठी निघालेल्या वाहनांकडून टोल आकारणी केल्याने विरोध करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी टोल आकारणी सवलत दिली जाते आम्हाला का दिली जात नाही, असे म्हणत आंदोलकांनी ठिय्या आंदोलन सुरू केल्याने पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज पुणे साखर आयुक्त कार्यालयावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ऊस उत्पादकांना अधिक दर मिळावा, उसातील काटेमारी थांबवण्यात यावी यासह अनेक प्रश्न घेऊन त्यांनी आंदोलन करण्याचे ठरवले आहे. याकरिता त्यांनी राज्यभरातील शेतकऱ्यांना पुणे येथे येण्याचे आवाहन केले होते.

Justice Sirpurkar, Hyderabad encounter,
हैदराबाद एन्काउंटरची चौकशी करणारे न्यायमूर्ती म्हणाले, “जलद न्यायाच्या मागे लागू नका…”
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Jagan Mohan Reddy
नायडूंना खोटे बोलण्याची सवयच, जगन मोहन रेड्डी यांचे मोदींना पत्र; मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप
Congress complains to Governor about law and order neglecting farmers print politics news
शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, कायदासुव्यवस्था ढासळली; काँग्रेसची राज्यपालांकडे तक्रार
Controversial statement case High Court orders Thane Magistrate in case against Jitendra Awhad
वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण: जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा नोंदवण्याच्या मागणीचा पुनर्विचार करा,उच्च न्यायालयाचे ठाणे न्यायदंडाधिकाऱ्यांना आदेश
ex finance minister of j and k haseeb drabu on Article 370
अनुच्छेद ३७० रद्द करून कोणी, काय मिळवले? जम्मू-काश्मीरचे माजी अर्थमंत्री हसीब द्राबू यांचा सवाल
cbi anil Deshmukh marathi news
सीबीआयकडून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पोलीस उपायुक्त, निवृत्त सहाय्यक आयुक्तांवर गुन्हा
NRC application for adhar card
आसाममध्ये आधार कार्ड बनवण्यासाठी नवा नियम; मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमांनी केली मोठी घोषणा; म्हणाले…

हेही वाचा : पुण्यात कंपनी मालकाच्या नावे दोन कोटींचे कर्ज, फसवणूक प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा

त्यानुसार कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील हजारो शेतकरी आज पुणे येथे वाहनातून निघाले होते. आणेवाडी टोल नाका येथे आल्यावर त्यांच्याकडून टोल आकारणी करण्यात आली. मात्र आंदोलनासाठी जात असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी टोल आकारणी केली नव्हती. आमच्याकडून का करता, असा सवाल त्यांनी केला. यातून टोल नाक्यावरील कर्मचारी व कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. परिणामी टोलनाक्यावरून होणारी वाहतूक बंद पडली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली.