ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे अलीकडेच तुरुंगातून सुटून आले आहेत. पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. पत्राचाळ घोटाळ्यात त्यांना जवळपास १०० दिवस त्यांना तुरुंगात राहावं लागलं. या संपूर्ण घटनाक्रमानंतर संजय राऊत यांनी नाशिक येथील सभेत तुरुंगातील अनुभव सांगितला. आपण तुरुंगात अतोनात त्रास सहन केला, असं विधानही संजय राऊतांनी यावेळी केलं.

खरं तर, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मालेगावात २६ मार्च रोजी जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी मालेगाव दौरा केला. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केलं. दरम्यान, त्यांनी आपले तुरुंगातील अनुभव सांगितले आहेत.

Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Santosh Deshmukh Brother Dhananjay Deshmukh
Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख यांचा मोठा खुलासा, “त्यादिवशी आरोपी आणि एपीआयचं चहाचं बिल मीच दिलं, त्यानंतर त्याने…”
Milind Gawali
मिलिंद गवळींची अशोक सराफ यांच्यासाठी खास पोस्ट; म्हणाले, “कदाचित म्हणूनच इतक्या वर्षांनंतर…”
Jitendra Awhad on Badlapur case akshay shinde
“अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही”, बदलापूर प्रकरणातील आरोपीबाबत जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा!
sanjay raut
Sanjay Raut : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी संजय राऊत यांची प्रतिक्रिया, “राजकीय फायद्यासाठी पोलिसांचे बळी…”
Crime
Crime News : अपहरणाच्या गुन्ह्यात तुरूंगात गेला, जामीनावर सुटल्यावर केली १५ वर्षीय मुलीची हत्या; नेमकं घडलं काय?
Bharat Gogawale
Bharat Gogawale : पालकमंत्रीपदावरून डावलल्यानंतर भरत गोगावलेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जिल्ह्यातलं वातावरण…”

हेही वाचा- “ती ऑडिओ रेकॉर्डिंग मी स्वत: केली”, जितेंद्र आव्हाडांच्या मुलीला जीवे मारण्याच्या कटाबद्दल मोठा खुलासा

यावेळी संजय राऊत म्हणाले, “गेली चार-पाच दिवस माझी प्रकृती खरोखर बरी नाही. पण आज येथे यायचं ठरलं होतं. म्हणून मी टाळलं नाही. कारण मला आज मालेगावात यायचंच होतं. जेव्हा मी एखाद्याला गाडायचं ठरवतो, त्याला गाडतोच. आज त्याची सुरुवात झाली आहे. परवा मला दिल्लीत एका मुलाखतीत प्रश्न विचारला, हे गद्दार शिवसेना भवनावर चाल करून येणार आहेत. मी म्हटलं येऊ द्या… त्यांना २० फूट जमिनीच्या आतमध्ये गाडल्याशिवाय राहणार नाही. २० फूट जमिनीच्या खाली गाडू… ही धमकी आहे का? असं विचारल्यावर मी म्हटलं… होय, धमकी आहे असं समजा. ही नुसती धमकी नाही. तर ही धमकी कृतीमध्ये उतरवण्याची क्षमता आमच्यात आहे.”

हेही वाचा- “शिवसेना भवनावर चाल करून येणाऱ्या गद्दारांना…”, ही धमकी समजा म्हणत संजय राऊतांचं मोठं विधान!

तुरुंगातील त्रासाबद्दल संजय राऊत म्हणाले, “लोक म्हणतात की, संजय राऊत खूप टोकाचं बोलणारा माणूस आहे. होय, मी टोकाचं बोलणारा माणूस आहे. कारण मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. मी तुरुंगात जाऊन आलोय. मी माझ्या पक्षासाठी तुरुंगात जाऊन आलो. मी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी तुरुंगात जाऊन आलो. या ५० गद्दारांप्रमाणे मी गुडघे टेकले असते, तर मीही तुरुंगात जाण्यापासून वाचलो असतो. मी तुरुंगात अतोनात त्रास सहन केला. तरीही मी शिवसेना सोडली नाही. सोडणारही नाही. कारण असंख्य शिवसैनिक समोर बसले आहेत. ती खरी शिवसेना आहे. त्याच्यासाठी मला आणि आपल्याला लढायचं आहे.”

Story img Loader