एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदारांना अलीबाबा आणि चालीस चोर असं म्हटलं जातं. अशा चोरांच्या हाती कुठलीही संसदीय लोकशाहीची कुठलीही सूत्रं असू नयेत असं राज्याला वाटतं आहे. पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा चोरांसाठीच आहे असं म्हणत कोल्हापुरात संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळेच मी चोर मंडळ म्हटलं आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. माझ्या विरोधात जी समिती नेमली जाते आहे त्या समितीला अभ्यास करू द्या काही मदत लागली तर मी जरूर करेन असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आपण जी संसदीय लोकशाहीची पद्धत स्वीकारली आहे त्यामध्ये विरोधकांचं स्थान उच्च आहे. पंडित नेहरू ते मनमनोहन सिंह यांच्यापर्यंत प्रत्येकाने विरोधकांचा आवाज ऐकला आहे. जेव्हा हा आवाज दडपला जातो तेव्हा जनता त्या सरकारला उत्तर दिलं आहे हा इतिहासही आपल्याला ठाऊक आहे असंही संजय राऊत म्हणाले. तसंच मुख्यमंत्री विरोधकांना जे देशद्रोही म्हणाले ते आत्ता ज्या संगतीत वावरत आहेत त्याचा परिणाम आहे. सुसंगत सोडून त्यांनी कुसंगत धरली आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

PM Narendra Modi Speech
Narendra Modi : ४० मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांना कसं लक्ष्य केलं?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशातल्या एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, तेच म्हणाले होते…”
Sanjay Raut Ajit Pawar (1)
“अजित पवारांना आता मुख्यमंत्री व्हायचं नाही, कारण…”, संजय राऊतांची स्तुतीसुमने; नेमकं काय म्हणाले?
devendra bhuyar marathi news
अजित पवारांच्या पक्षाचा माजी आमदार म्हणतो, “अर्थसंकल्प भ्रमनिराश करणारा!”
loksatta article mahatma Gandhi assassination opposition is left to criticize rss
महात्मा गांधी केवळ संघविरोधासाठीच उरले आहेत?
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
lokmanas
लोकमानस: लोकशाही की एकाधिकारशाही?

श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचे चांगले संबंध होते. उद्धव ठाकरे आणि शाहू महाराज यांचेही चांगले संबंध आहेत. मी आज कोल्हापूरला आलो आहे म्हटल्यावर त्यांची भेट घेणारच होतो ती आज घेतली. विविध विषयांवर आम्ही संवाद साधला अशीही माहिती संजय राऊत यांनी दिली.

सध्या शिवसेनेसोबत जे काही घडलं आहे त्यात सर्वोच्च न्यायालय हा एकमेव आशेचा किरण आमच्यासाठी आहे. देशासाठी आहे, कारण सर्वोच्च न्यायालय हेच एक मंदिर आता आम्ही मानतो इतर मंदिरांमध्ये चप्पल चोरांची गर्दीच जास्त झाली आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

२०२४ ला सर्वांचा हिशोब चुकता करू. गद्दारांनी आम्हाला धडे देऊ नयेत. येणाऱ्या काळात गद्दाराच्या राजकीय अंतयात्रा निघणार आहेत. सत्य काय आहे ते २०२४ ला दाखवू हा संदेश महाराष्ट्राला कोल्हापूरकरांचा पोहोचला पाहिजेत. झडलेल्या झाडाची फुले पडली आहेत. आता नव्याने पुन्हा पालवी येऊन फुले डोलणार आहेत. यामुळे शिवसैनिकांनी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.

Story img Loader