सावंतवाडी : एमपीएससी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने वयवाढ केलेली नसून केवळ २०२४ च्या कम्बाइनच्या एका जाहिरातीसाठी विशेष संधी दिलेली आहे. आगामी होणाऱ्या राज्यसेवा आणि कम्बाईन परीक्षेपासून राज्यातील लाखो परीक्षार्थी अपात्र ठरले आहेत. राज्य शासनाने छतीसगड राज्यासह इतर आठ राज्यांचा आदर्श घेऊन छतीसगड राज्यशासनाने सन २०२८ पर्यंत वयोमर्यादेत वाढ केली आहे. मग महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील राज्याला वयवाढ किमान ३१ डिसेंबर २०२७ पर्यंत द्यायला काय अडचण आहे? राज्य शासनाने केवळ फसवणूक केली असल्याचा आरोप विद्यार्थ्यांमधून केला जात आहे. तसेच न्याय हक्कासाठी आंदोलन छेडणार असल्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.

राज्य शासनाने ३ मार्च २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ असा शासन निर्णय जाहीर केला. परंतु या शासन निर्णयाचा फायदा प्रत्यक्षात जेमतेम ९ ते १० महिनेच मिळतो. या कालावधीत एकही जाहिरात प्रसिद्ध झाली नाही. २०२४ ची कम्बाईन गट ब व गट क जाहीरात तब्बल आठ ते नऊ महिने उशीरा आली. याला जबाबदार विद्यार्थी नसून शासन आहे. २०२४ च्या कम्बाईन जाहिरातीसाठीच केवळ विशेष संधी दिली असून राज्य शासनाने वय वाढीसाठी ठोस कोणतेच निर्णय घेतले नसल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.

Cm Devendra Fadnavis in loksatta events
‘वर्षवेध’चे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन; स्पर्धा परीक्षांचा ‘वाटाड्या’ पूर्णपणे नव्या स्वरूपात
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
How To Prepare for UPSC Prelims 2025
UPSC Prelims 2025 : यूपीएससी प्रिलिम्सची तयारी करताय? मग अभ्यासाच्या ‘या’ टिप्स एकदा नक्की वाचा
Maharashtra: 784 percent schools in state now have computer facilities, says report
राज्यातील ७८.४० टक्के शाळांमध्ये संगणक वाचन, गणित विषयात प्रगती, शालेय शिक्षण विभागाचा दावा
mpsc exam latest news in marathi
MPSC Exam 2025: ‘एमपीएससी’ परीक्षेसाठी मोबाईल जॅमर, सीसीटीव्ही, पोलीस आणि…
This years Maharashtra State Board exams include changes in grace marks awarding process
बोर्डाच्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या ‘ग्रेस’ गुणांबाबत मोठा निर्णय…
BMC cbse and icse school 10th class exams news in marathi
पालिकेच्या सीबीएसई आणि आयसीएसई शाळेचे विद्यार्थी प्रथमच दहावीची परीक्षा देणार, पालिकेच्या शिक्षण विभागाची कसोटी
strict action against students if found with a mobile phone in an exam
खबरदार ! परीक्षेत विद्यार्थ्याकडे मोबाईल आढळल्यास आता इतके वर्ष…

हेही वाचा – Atul Save : कॅबिनेट मंत्री अतुल सावेंविरोधात शिवसेना मैदानात, पालकमंत्रीपदास केला विरोध

सदर शासन निर्णयामध्ये सरसकट दोन वर्षे वयवाढ म्हणजे २४ महिने असा उल्लेख होतो. सध्या संपूर्ण लाभ म्हणजेच २४ महिने मिळालाच नाही. तो प्रत्यक्षात १० महिनेच लाभ मिळाला आहे. संपूर्ण २४ महिने म्हणजे खरेतर शासनस्तरावरूनच हा शासन निर्णय ३ मार्च २०२३ ते २ मार्च २०२५ असा असायला हवा होता. तरच खऱ्या अर्थाने दोन वर्षे वयवाढ मिळू शकली असती. परंतु, शासनाने असे न करता लाखो स्पर्धा परीक्षार्थींची फसवणूक केली आहे. शासन स्तरावरून २०२३ चा जीआर उशिरा लागू झाला. ३१ डिसेंबर २०२३ ला सदर वयवाढ जीआरची मुदत संपून गेली आहे.

हेही वाचा – Ministers Bungalows : धनंजय मुंडेंना ‘सातपुडा’, पंकजा मुंडेंना ‘पर्णकुटी’ वाचा कुठल्या मंत्र्याला मिळाला कुठला सरकारी बंगला?

राज्य शासनाने ३१ डिसेंबर २०२३ च्या शासन निर्णयानुसार ३१ डिसेंबर २०२७ अशी वयोमर्यादेत वाढ करावी. जेणेकरून सरसकट विद्यार्थांना न्याय मिळेल. कोरोनामुळे इतर आठ राज्यांनी वयोमयादेत वाढ करून विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा नव्याने संधी दिली आहे. मात्र महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याने तर विद्यार्थ्यांशी खेळ चालवला आहे. विद्यार्थी गुन्हेगार असल्यासारख राज्यशासन विद्यार्थ्यांवर अन्याय करीत आहे. विद्यार्थ्यांनी नेमकी दाद मागायची तरी कुठे ? असा सवाल विद्यार्थ्यांमधून केला जात आहे. राज्य शासनाने सहानुभुतीपूर्वक विद्यार्थ्यांना न्याय देऊन ३१ डिसेंबर २०२७ इतकी वयोमर्यादेत वाढ करावी. जेणेकरून सरसकट विद्यार्थ्यांना न्याय मिळून त्यांचे भावी अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होईल. अशी मागणी विद्यार्थ्यांमधून केली जात आहे.

Story img Loader