सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील मौजे वेलंग या गावात चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने महिलेचा गळा दाबून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर महिलेच्या दोन लहान मुलांना वेलंग गावाजवळ असणाऱ्या विहिरीत ढकलून दिल्याचं समोर आलं. दत्ता नारायण नामदास असे संशयित आरोपीचे नाव आहे.

या घटनेनंतर संशयित आरोपी दत्ता नामदास त्याच्या मूळ गावी अकलूज याठिकाणी निघून गेला होता. दरम्यान, या प्रकरणात रहिमतपूर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी दत्ता नामदास यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. १५ जून रोजी रात्रीच्या सुमारास चारित्र्याच्या संशयावरून दत्ता नामदास आणि योगिता यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. जेवण झाल्यानंतर आरोपी दत्ता नामदासने योगिताची गळा दाबून हत्या केली.

Policeman dies in accident while returning from funeral of women police
अंत्यसंस्कारावरून परतताना पोलिसाचा अपघाती मृत्यू
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
vasai virar increase population news in marathi
शहरबात : वाढत्या लोकसंख्येचे बळी
2 killed as auto overturn in khed taluka
मरकळ येथे रिक्षा उलटून दोघांचा मृत्यू
Woman murdered in broad daylight in Ambernath
अंबरनाथमध्ये भरदिवसा महिलेची हत्या; पूर्वेतील उड्डाणपुलाशेजार घडली घटना, अंबरनाथमध्ये खळबळ
SC to hear plea seeking safety measures for devotees at Mahakumbh on Feb 3
कुंभमेळ्यासंबंधी याचिकांवर आज सुनावणी
Satara , Mother, conspired, boyfriend, murder,
सातारा : आईने प्रियकरासोबत मुलाच्या हत्येचा रचलेला कट उधळला
allegations over the post of Guardian Minister of Raigad
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून आरोपप्रत्यारोप

यानंतर दोन मुलांना विहिरित ढकलून दिले. समीर आणि तनु अशी या लहान मुलांची नावे आहेत. ही हत्या करून आरोपीने वेलंग येथील राहत्या घराला बाहेरून कडी लावून अकलूजला पलायन केले.

हेही वाचा : धुळ्यात प्रेम संबंधांमुळे रात्री ३ वाजता बहिणीची हत्या करुन पहाटे अंत्यविधी उरकले; पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न उघड

दरम्यान, हा प्रकार स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ रहिमतपूर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी संशयित आरोपी दत्ता नारायण नामदासला ताब्यात घेतले. मानभाऊच्या मळ्यातील विहिरीतून मुलांचा मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून मुलांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. या घटनेने सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Story img Loader