अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) ऋतुजा लटेकांचा विजय झाला आहे. लटकेंना ६६ हजार २४७ मतं मिळाली आहे. तर, नोटाला १२ हजार ७७८ मतं मिळाली असून, १ हजार ५६९ मतांसह राजेश त्रिपाठी तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर ठाकरे गटाचा पहिलाच दणदणीत विजय आहे. या विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे. मात्र, यावर भाजपाचे नेते मुरजी पटेल यांनी टीका केली आहे.

“निवडणुकीतून माघार घेतली नसती, तर एक लाख २० हजार मते भाजपाला मिळाली असती. मात्र, याच्यात आम्हाला पडायचं नाही, ऋतुजा लटकेंना मी शुभेच्छा दिल्या आहेत. पण, एका गोष्टीची खंत वाटत आहे. श्रद्धांजली आणि सहानुभूतीच्या नावावर मते मागितली आणि नंतर फटाके फोडले आणि ढोल वाजवले, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही,” अशी टीका मुरजी पटेल यांनी ऋतुजा लटकेंवर केली आहे.

राहुल गांधींनी उल्लेख केल्याने बावनकुळेंचा कामठी मतदारसंघ पुन्हा चर्चेत
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
revenue minister chandrashekhar bawankule on son law loan catering money Wardha
“जावयाचं कर्ज नको, हे घ्या जेवणाचे पैसे,” महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे असे का म्हणाले?
people of Pardhi community will get caste and birth certificate
आयुष्यात ‘हे’ प्रथमच जातीचा दाखला पाहणार, पालकमंत्र्यांनी असे काय केले की…
crime Uttar pradesh
क्रूरतेची परिसीमा! तरुणीवर बलात्कार करून निर्घृण हत्या, डोळेही काढले; कुटुंबीयांचा पोलिसांवर गंभीर आरोप!
minister uday samant on Marathi language,
मराठीचा अनादर करणाऱ्यांची दादागिरी ठेचून काढू; मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचा इशारा
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
devendra bhuyar marathi news
अजित पवारांच्या पक्षाचा माजी आमदार म्हणतो, “अर्थसंकल्प भ्रमनिराश करणारा!”

हेही वाचा : ‘हर हर महादेव’, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटावर संभाजीराजे संतापले, इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप

“अंधेरीला पहिला महिला आमदार भेटल्या आहेत. त्यांना प्रत्येक कामात सहकार्य करु. मात्र, बांद्रा येथील तृप्ती सावंत यांच्याबद्दल जे घडलं, तसे २०२४ ला ऋतुजा लटके यांच्याबद्दल होऊ नये हीच अपेक्षा आहे. तसेच, एकाही भाजपा कार्यकर्त्याने नोटाला मतदान करण्यास सांगितलं नाही. स्वत:चा कमीपण समोर येऊ नये म्हणून असा आरोप येत आहे. १ लाख ९० हजार लोकांनी मतदान केलं नाही, याचं उत्तर महाविकास आघाडीला द्यावे लागले,” असेही मुरजी पटेल यांनी म्हटलं आहे.

Story img Loader