Nagpur Clashes Updates: नागपूरच्या महाल परिसरात सोमवारी रात्री दोन गटांमधील वादानंतर हिंसक संघर्ष झाला, ज्यामुळे तोडफोड आणि जाळपोळ झाली. अनेक वाहने जाळण्यात आली असून, दगडफेकीच्या वृत्तांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागपूर : भालदारपुरा येथे ५ हजार युवक आले कुठून?
नागपूर : चिटणीस चौकातून दंगलीला सुरुवात झाली. या चौकाला लागूनच भालदारपुरा ही मुस्मील बहुल वस्ती आहे. या वस्तीची लोकसंख्या आणि दंगलीपूर्वी सोमवारी सायंकाळी एकत्र आले युवकांची संख्या याचा ताळमेळ जुळत नाही. येथे कामठी, टेकानाका आणि मोमीनपुरा येथून लोक आले होते, असे भालदरा येथील नागरिकांनी सांगितले.
नागपूर दंगल : सूत्रधाराला बेड्या ठोका; मंत्री बावनकुळे म्हणतात, ‘मुलाहिजा…’
नागपूर : शांतताप्रिय नागपुरातील महाल परिसरात सोमवारी घडलेली हिंसाचाराची घटना दुर्भाग्यपूर्ण असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे. तथापि, विरोधकांनी या घटनेचे राजकारण न करता समाजकंटकाना शोधण्यासाठी मदत करावी, असे आवाहन महसूल मंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. त्यांनी हिंसाचारातील सूत्रधाराला बेड्या ठोकण्याचे आवनहन केले.
विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी म्हणाले, ‘आम्ही जी चादर जाळली, त्यावर ‘आयत’ नव्हती…’
नागपूर : ‘आम्ही जी चादर जाळली, त्यावर ‘आयत’ नव्हती’, असे स्पष्टीकरण विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले. औरंगजेबाच्या कबरीवरुन नागपुरात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. नागपुरात घडलेल्या घटनेचा आम्ही निषेधच करतो, पण जी चादर जाळल्याचा आरोप आमच्यावर होत आहे, तो खोटा आहे. आम्ही चादर जाळली, पण त्यावर ‘आयत’ नव्हती, असे स्पष्टीकरण विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले.
नागपूर दंगल… अश्रूधुरामुळे दोन बालकांचा श्वास…
नागपूर : नागपुरातील महाल परिसरात सोमवारी रात्री (१८ मार्च २०२५) दोन गटात संघर्ष पेटल्याने तणाव निर्माण झाला होता. जमाव नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यासह सौम्य लाठीमारही करावा लागला. या अश्रुधाराच्या नळकांड्याचा धूर भालदारपुरातील एका घरात शिरला. त्यामुळे एकाच कुटुंबातील दोन चिमुकल्यांचा श्वास गुदमरल्याने एकाच खळबळ उडाली.
पोलिसांनीच आमची घरे, गाड्या फोडल्या, माझ्या मुलांना घरातून ओढत नेले, डोळा फोडला, त्यांना परत आणून द्या, मुस्लीम महिलेची…
नागपूर : सोमवारी रात्री झालेल्या दंगलीनंतर या भागातील स्थानिक दुकानदारांची दुकाने बंद आहेत. जमावाने जाळलेल्या गाड्या तशाच उभ्या आहेत. ज्या परिसरात ही घटना घडली तिथे संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. आज दंगल शमली आहे. परंतु, पोलीस विभागाच्या दडपशाही धोरणाने मुस्लिम बांधवांवर अमानुष अत्याचार केल्याच्या प्रतिक्रिया हसनपुरी आणि भालदारपुरा परिसरातील मुस्लीम बांधवांच्या आहेत.
सविस्तर वाचा..
Nagpur Violence Updates: "नागपूरच्या घटनेत सरकारचा सहभाग", नाना पटोलेंची टीका
Nagpur Violence Live Updates: नागपूर हिंसाचारावर बोलताना काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सरकारवर टीका केली आहे. पटोले म्हणाले, "जर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या घटनेला पूर्वनियोजित म्हणत असतील, तर ते सरकार आणि पोलिसांचे अपयश आहे हे स्पष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः नागपूरचे आहेत; जर ही घटना तिथे घडत असेल, तर ते सरकारचे अपयश आहे. त्यांचे एकमेव ध्येय महाराष्ट्र उद्ध्वस्त करणे आहे. नागपूरमधील घटनेत सरकारचा सहभाग होता."
Nagpur: "मला वाटते भाजपा महाराष्ट्राला पुढचे मणिपूर…", नागपूर हिंसाचारावरून आदित्य ठाकरेंची भाजपावर टीका
सोमवारी रात्री नागपूरमध्ये तीव्र हिंसाचार झाला असून, महाल परिसरात दगडफेक, वाहनांची तोडफोड आजूबाजूच्या परिसरात जाळपोळ झाली आहे. या घटनेपासून शहरात तणावपूर्ण परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत नागपूर शहरातील अनेक भागांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेनंतर राज्य सरकारसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली आहे. अशात शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी, भाजपा महाराष्ट्राला पुढचे मणिपूर करू इच्छित असल्याचे म्हटले आहे.
दंगलीच्या परिस्थितीतही ‘त्यांची’ जखमींना आरोग्य सेवा
नागपूर : औरंगजेबाच्या कबरीवरुन सोमवारी रात्री उपराजधानी अक्षरश: पेटली. कित्येक तास चाललेला दोन गटातील संघर्ष वाहने फोडण्यापासून तर दगडफेकीपर्यंत सुरूच होता. यात कित्येकजण जखमी झाले, पण हा संघर्ष थांबता थांबत नव्हता. जमावाला आवरताना पोलिसांचीही दमछाक झाली आणि त्यांनाही गंभीर जखमा झाल्या. डॉ. हर्षा वैद्य यांनी. एवढ्या दंगलीच्या परिस्थितीतही त्या जखमींना आरोग्य सेवा देत आहेत.
नागपूर हिंसाचारावर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
नागपूर हिंसाचारावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ म्हणाले, "ही खूप दुःखद बातमी आहे. लोकांनी दगडफेक टाळावी. हे खूप वाईट आहे. जर काही अडचणी असतील तर त्या रस्त्यावर नाही तर चर्चेतून सोडवता येतात."
Nagpur Violence Updates : दंगलीनंतर विहिंपचे प्रवक्ते म्हणतात, जिहादींवर कठोर …
नागपूर दंगल प्रकरणाबाबत विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बंसल यांनी नुकतीच आपली प्रतिक्रिया दिली आहे. नागपूरमध्ये अफवा पसरवणाऱ्या आणि हिंसाचार करणाऱ्या जिहादींवर कडक कारवाई करावी आणि औरंगजेबाच्या कबरीच्या ठिकाणी पूज्य धना जी, संता जी, छत्रपती राजाराम महाराज जी यांचे स्मारक बांधावे अशी मागणी केली.
Nagpur Violence Updates : नागपूर शहरात तणावपूर्ण शांतता, १५० पेक्षा अधिक लोकांवर गुन्हे दाखल करून अटक
नागपूर : पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागपुरातील अर्ध्या अधिक भागात संचारबंदी जाहीर केली आहे. तरीही शहरात सध्या तणावपूर्ण शांतता असल्याची स्थिती आहे.
Nagpur Violence Updates : दंगलीच्या सावटातही नागपूर महापालिका कर्मचारी रस्त्यावर, पहाटेपर्यंत संपूर्ण परिसर…
नागपूर : भीतीयुक्त वातावरणातही नागपूर महापालिकेचे सफाई कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले आणि पहाटेपर्यंत त्यांनी या संपूर्ण रस्त्यावरील दगड आणि काचा उचलून रस्ता स्वच्छ केला.
DCM Eknath Shinde : “नागपुरातील घटना पूर्वनियोजित कट?”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना संशय, म्हणाले, “या भागात रोज…”
नागपुरात घडलेल्या हिंसाचारामुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. औरंगजेबाची कबर काढून टाकण्यासाठी झालेल्या आंदोलनाला वेगळं वळण लागलं अन् १७ मार्च रोजी रात्री नागपुरातील महाल परिसरात दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. या घटनेत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असून पोलीस आणि इतर काही नागरिक जखमी झाले आहे. दरम्यान, ही घटना पूर्वनियोजित होती, असा संशय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ते आज विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलत होते.
Nagpur Violence Updates : दोन पोलीस उपायुक्तांसह २२ जखमींना तातडीने…
नागपुरातील महाल परिसरात सोमवारी रात्री (१८ मार्च २०२५) दोन गटात संघर्ष पेटल्याने तणाव निर्माण झाला होता. जमावाने एका उपयुक्तांवर कुऱ्हाडीने हल्ला केला असून इतरांवर दगड व इतर वस्तू फेकल्याने अनेक पोलीस व नागरिक जखमी झाले.
नागपूरमध्ये दोन हजाराहून अधिक पोलिसांची गरज, २३४ कोटींचा अपेक्षित खर्च…
नागपूर लोकसंख्या वाढत असल्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मनुष्यबळाचा अभाव आहे. शहरात संघ मुख्यालय, दीक्षाभूमी, विमानतळ, मुख्यमंत्र्यांचे निवास यासह विविध महत्त्वाची स्थळे आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर शहरात नवे पोलिसांची पदे मंजूर करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात यावा, अशी विनंती पोलीस आयुक्तांनी गृह विभागाकडे केली आहे.
Nagpur Violence: नागपूरमध्ये सध्या कशी आहे परिस्थिती? पोलीस आयुक्त म्हणाले, "हिंसाचार करणाऱ्यांची…"
Nagpur Violence Updates: नागपूरमध्ये काल झालेल्या हिंसाचारानंतर शहरात सध्या काय परिस्थिती आहे, याबद्दल नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रविंदर सिंघल यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले, "नागपूरमध्ये परिस्थिती नियंत्रणात असून शहरात सध्या शांतता आहे. या हिंसाचाराप्रकरणी आम्ही ५० हून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांना आम्ही शोधून काढत आहोत."
डॉ. रविंदर सिंगल यांनी पुढे सांगितले की, "या घटनेत ३३ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलिसांनी चांगले काम केले आहे. हिंसाचार करणाऱ्यांची ओळख पटवली जात असून, त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर सर्व संबंधित कलमे लागू केली जाणार आहेत. नागपुरात पोलीस आणि इतर सुरक्षा दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. नागपूरच्या काही भागात संचारबंदी लागू आहे. अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून संबंधित लोकांसोबत बैठक घेण्यात येणार आहे."
Nagpur Violence Updates : पालकमंत्री बावनकुळेंची नागपूरच्या दंगलीवर पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “घटनेचा मोरक्या कोण?….”
विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी बावनकुळे यांना नागपूरची परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पाठवले आहे. बावनकुळे यांनी विमानतळावर प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
Nagpur Violence Updates : विजय वडेट्टीवार थेटच म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी ‘ त्या’ मंत्र्याला आवरले असते तर दंगल झाली नसती”
गेले चार महिने सत्तेतील एक मंत्री दोन समाजामध्ये दरी निर्माण करेल असे वक्तव्य करत आहेत. त्यामुळे त्या मंत्र्यांला वेळीच आवर घालण्याची आवश्यकता होती. नागपूरच्या दंगलीनंतर विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
नागपूरच्या दंगलीबाबत भाजप आमदारांच्या मोठा आरोप, म्हणाले…
नागपूरच्या महल परिसरातील घरे आणि वाहने जाळण्याबाबत आमदार प्रवीण दटके मोठे विधान केले आहे.
दंगलीमुळे नागपुरातील जनजीवन विस्कळीत, शाळांना सुट्टी जाहीर
नागपूर : दोन गटांत संघर्ष पेटल्यामुळे महालमधील झेंडा चौकात तणाव निर्माण झाला. एका गटातील युवकांनी पोलिसांवर दगडफेक केली. प्रत्युत्तरात पोलिसांनीही त्या गटावर अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवला. हा सर्व प्रकार सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडला. याचा परिणाम शहरातील सामान्य जनजीवनावर झालेला आहे. शहराच्या अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.
नागपूर: महालमधील जाळपोळ, दगडफेक, तोडफोडीचे पडसाद शहरातील अन्य भागातही…
नागपूर : विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने औरंगजेबची कबर हटवण्यासाठी केलेल्या आंदोलनानंतर सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास दोन गटात संघर्ष पेटला. जवळपास चार तास महाल परिसर, चिटणीस पार्क परिसर यासह अन्य ठिकाणी तुफान दगडफेक, तोडफोड, रस्त्यावर जाळपोळ आणि नारेबाजी करण्यात आली.
Nagpur Violence: "नागपूरमधील हिंसाचार नियोजित असल्याचा संशय", गृह राज्यमंत्र्यांचे मोठं वक्तव्य
सोमवारी रात्री नागपूरमध्ये हिंसाचार झाला असून, महाल परिसरात दगडफेक, वाहनांची तोडफोड आणि आजूबाजूच्या परिसरात जाळपोळ झाली. या घटनेपासून शहरात तणावपूर्ण परिस्थिती आहे.
याबाबत बोलताना राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी ही घटना नियोजित असल्याचा संशय असल्याचे म्हटले आहे. यासाठी कुठे आणि कोणी नियोजन केले याचा तपास सुरू करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
Nagpur Violence: नागपूर हिंसाचारप्रकरणी ६० हून अधिक आरोपी ताब्यात, पोलीस आयुक्तांची माहिती
नागपूरमधील दंगल, तोडफोड आणि जाळपोळ प्रकरणी ६० हूनजणांना ताब्यात घेण्यात आले असून, याप्रकरणी ४ एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी दिली आहे. या दंगलीत १५ पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले.
Nagpur Violence: "धारदार शस्त्रे, स्टिक्स आणि बाटल्या…", नागपूर हिंसाचाराबाबत प्रत्यक्षदर्शींनी नेमकं काय सांगितलं?
नागपूरातील तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनेवर बोलताना हंसापुरी भागातील एका प्रत्यक्षदर्शी स्थानिक महिलेने सांगितले की, "एक जमाव येथे आला, त्यांचे चेहरे स्कार्फने झाकलेले होते. त्यांच्या हातात धारदार शस्त्रे, स्टिक्स आणि बाटल्या होत्या. त्यांनी गोंधळ सुरू केला, दुकानांची तोडफोड केली आणि दगडफेक केली. यावेळी त्यांनी वाहनेही जाळली."
Nagpur Violence:मुख्यमंत्री फडणवीस यांचं शहर जळत असेल तर यापेक्षा वाईट काहीही नाही: यशोमती ठाकूर
Nagpur Violence: नागपूर हिंसाचारावर बोलताना काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर म्हणाल्या, "नागपूरमध्ये जे घडले ते लज्जास्पद आहे. जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर जळत असेल तर यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही. आपले लक्ष महाराष्ट्राला पुढे नेण्यावर असले पाहिजे, क्षुल्लक मुद्द्यांवर वाद घालण्यावर नाही."
Nagpur Violence Live Update : जिथे दंगल झाले त्या महाल परिसरातील सद्यस्थिती पाहा!
Nagpur Violence : नागपुरात संचारबंदी लागू, पोलिसांना प्रभावित रस्ते बंद करण्याचे आदेश; अधिसूचना जारी!
नागपुरात कबर हटवण्याच्या मागणीवरून सोमवारी रात्री (१७ मार्च) मोठा तणाव निर्माण झाला. दोन गटात झालेल्या दगडफेक आणि जाळपोळच्या घटनेमुळे नागपुरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, भारतीय नागरीक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत नागपूर शहरातील अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत अधिसूचनेतून समोर आली आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
नागपुरात दंगल नेमकी कशामुळे भडकली ? असा आहे घटनाक्रम
विश्व हिंदू परिषदेच्या जवळपास ३० ते ३५ कार्यकर्त्यांनी दुपारी एक वाजता महाल झेंडा चौकात औरंगजेबाचे छायाचित्र आणि प्रतिकात्मक कबर तयार केली. औरंगजेबाच्या छायाचित्राला चपलेने मारून निषेध व्यक्त केला.
Nagpur Violence: नागपूर हिंसाचारावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, "जर कोणी दंगल केली किंवा पोलिसांवर…"
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "नागपूरच्या महाल परिसरात ज्या पद्धतीने परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे ती अत्यंत निषेधार्ह आहे. काही लोकांनी दगडफेक केली, अगदी पोलिसांवरही. हे चुकीचे आहे. मी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे."
या घटनेवर व्हिडीओद्वारे प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक असलेली कठोर पावले उचलण्याचे मी पोलिस आयुक्तांना सांगितले आहे. जर कोणी दंगल केली किंवा पोलिसांवर दगडफेक केली किंवा समाजात तणाव निर्माण केला तर अशा सर्व लोकांवर कठोर कारवाई केली पाहिजे. नागपूरची शांतता बिघडू नये यासाठी मी सर्वांना आवाहन करतो. जर कोणी तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल."
Nagpur Violence: नागपूर हिंसाचारावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “जर कोणी दंगल केली किंवा पोलिसांवर…”
नागपूर हिंसाचारावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “नागपूरच्या महाल परिसरात ज्या पद्धतीने परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे ती अत्यंत निषेधार्ह आहे. काही लोकांनी दगडफेक केली, अगदी पोलिसांवरही. हे चुकीचे आहे. मी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.”
या घटनेवर व्हिडीओद्वारे प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक असलेली कठोर पावले उचलण्याचे मी पोलिस आयुक्तांना सांगितले आहे. जर कोणी दंगल केली किंवा पोलिसांवर दगडफेक केली किंवा समाजात तणाव निर्माण केला तर अशा सर्व लोकांवर कठोर कारवाई केली पाहिजे. नागपूरची शांतता बिघडू नये यासाठी मी सर्वांना आवाहन करतो. जर कोणी तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.”