केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी स्मार्ट सिटी म्हणून प्राधान्यक्रमाने समावेश केलेल्या सोलापूर शहरात भरीव विकास होण्याच्या आशा आकांक्षा बाळगून असलेल्या सोलापूरकरांमध्ये सध्या वेगळ्याच चिंतेने अस्वस्थता निर्माण झाली आहे. स्मार्ट सिटीसह इतर पूरक विकासाच्या घोषणा होऊन वर्ष-दोन वर्षे उलटत असली तरी विकासाची पाऊलवाट कोठे दिसत नाही. तर उलट, महापुरुषांच्या नावांच्या अस्मितेचे राजकारण खेळत जाती-जातीत भांडणे लावण्याचा व त्यातून सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणण्याचे उद्योग सत्तेतील जबाबदार नेतृत्वाकडून होत आहेत. सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांचे नाव देण्याचे जाहीर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला खूश करण्याचा प्रयत्न करीत असताना इकडे या विद्यापीठाला सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांचे नाव डावलण्यात आल्याने वीरशैव लिंगायत समाजात संतापाची भावना वाढली आहे. हे कमी आहे म्हणूनच की काय, लिंगायत समाजाची नाराजी दूर करण्याच्या प्रयत्नात सोलापूर रेल्वे स्थानकाला कोणाचे नाव द्यायचे, यावरून आता नवा वाद उद्भवला आहे. हा वाद आणखी कसे वळण घेतो, याचा विचार करताना सोलापूरचे सामाजिक वातावरण कलुषित होण्याची भीती व्यक्त होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा