राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. परंतु सरकारने शेतकऱ्यांसाठी अद्याप पावलं उचललेली नाहीत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी केला आहे. आमदार पटोले म्हणाले, महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले आहे, परंतु अद्याप त्यासंबंधी सर्वेक्षण झालेलं नाही. शेतकरी आणि जनतेसमोर एकीकडे अस्मानी संकट आहे तर दुसरीकडे सुलतानी संकट आहे. शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या मागे नैसर्गिक संकट लागले आहे. सरकार केवळ घोषणांमागून घोषणा देत आहे. ईडी सरकार आल्यापासून केवळ घोषणांचा पाऊस पडत आहे, परंतु, अंमलबजावणी मात्र शून्य आहे.

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, नाना पटोले यांनी विधीमंडळाबाहेर येऊन प्रसारमाध्यमांशी बातचित केली. यावेळी नाना पटोले म्हणाले की, सरकार वर्षभरापासून केवळ पोकळ घोषणा देत आहे. जनतेच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. या सरकारवर शेतकरी व जनतेचा विश्वास राहिलेला नाही. राज्यात सरकार आहे की नाही? असा प्रश्न पडला आहे. प्रशासनात अनागोंदी सुरू असून जनतेला लुबाडलं जात आहे.

residents allege conspiracy to hinder adarsh nagar colony rehabilitation project in worli mumbai
खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी मोकाट; पुनर्वसन प्रकल्प बंद पाडण्याचे षडयंत्र, रहिवाशांचा आरोप
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
congress state president nana patole calls mahayuti government corrupt
महायुतीचे सरकार भ्रष्ट, तीन पक्षांत मलई खाण्याची स्पर्धा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा घणाघात
PM Narendra Modi on Swachh Bharat Abhiyan
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं विरोधकांना उत्तर, “स्वच्छ भारत योजनेची खिल्ली उडवणाऱ्यांना सांगतो, आम्ही रद्दी विकून २३०० कोटींचा निधी…”
Maharashtra Kesari 2025 result Shivraj Rakshe prithviraj mohol Controversy
Maharashtra Kesari : एवढं ‘मोहोळ’ का उठलंय? राष्ट्रवादीच्या नेत्याचा कुस्तीत राजकारण शिरल्याचा आरोप; म्हणाले, “खरा जिंकला तो…”
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Ramdas Kadam On NCP Ajit Pawar Group
Ramdas Kadam : राष्ट्रवादी-शिंदे गटात वादाची ठिणगी? रामदास कदमांचा मोठा आरोप; म्हणाले, “राष्ट्रवादीच्या ९० टक्के कार्यकर्त्यांनी…”
What Pankaja Munde Said?
Pankaja Munde : पंकजा मुंडेंचं वक्तव्य; “राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं, काही लोक सुपारी…”

नाना पटोले म्हणाले, मुंबईसह राज्यात सर्वत्र रस्त्यांवर खड्डेच खड्डे आहेत, सर्व रस्त्यांवर खड्यांचं साम्राज्य आहे, या खड्डयांमुळे वाहतूक कोंडी होत असून यामुळे अपघातही होत आहे. या अपघातांमध्ये लोकांचे नाहक बळी जात आहेत. खड्डेमुक्त रस्ते करण्याची घोषणा सरकारने केली होती, त्याचे काय झालं? असा संतप्त प्रश्नही पटोले यांनी उपस्थित केला. राज्याची समृद्धी करायला निघालेल्या सरकारने समृद्धी महामार्ग हा मृत्यूंचा सापळा बनवला आहे. विधानसभेत सरकारला प्रश्न विचारले तर मंत्री स्पष्ट उत्तरे देत नाहीत, तपासू, बघू, पाहू अशी उत्तरे दिली जात आहेत.

हे ही वाचा >> रक्षकच झाला भक्षक! मणिपूरमध्ये BSF जवानाकडून स्थानिक महिलेबरोबर अश्लील कृत्य

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले, राष्ट्रीय महामार्गावरील टोलसंदर्भात नियमावली आहे. रस्त्यावर खड्डे असतील तर टोल घेतला जात नाही पण राष्ट्रीय महामार्गांवर खड्डेच खड्डे असताना टोल वसुली केली जात आहे. टोलमाफियांचे राज्य असून सरकार त्यांच्यावर कारवाई करत नाही. टोल माफिया सरकारचे जावई आहेत का? असा सवालही नाना पटोले यांनी यावेळी उपस्थित केला.

Story img Loader