आगामी लोकसभा निवडणुकांसाठी देशभरातील पक्ष मोर्चेबांधणी करू लागले आहेत. काँग्रेसनेही या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाल्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास बळावला आहे. महाराष्ट्रातही काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यात भाजपा आणि शिंदे गटाला सत्तेपासून बाजूला करायचं हा एकमेव उद्देश असल्याचं काँग्रेस नेते सांगत आहेत. अशातच महाविकास आघाडीच्या बैठका वाढल्या आहेत. भाजपाविरोधात तिन्ही पक्षांनी वज्रमूठ तयार केली आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष त्यांच्या मित्र पक्षांसह एकत्र लढतील अशी चिन्हं दिसत आहेत. तिन्ही पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत निर्णय घेण्यासाठी तिन्ही पक्षातील प्रत्येकी तीन-तीन प्रमुख नेत्यांची समिती तयार केली आहे. ही समिती आगामी काळात जागावाटपावर निर्णय घेईल.

Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”
Saif Ali Khan Records Statement With Mumbai Police
हल्ला झाला तेव्हा करीना कपूर कुठे होती? स्वतः सैफनेच पोलिसांना सांगितलं; जबाबात म्हणाला, “मी हल्लेखोराला…”
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचे महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाचे संकेत, भाषणात म्हणाले; “यावेळी मला सूड…”
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare :
Bharatshet Gogawale : राष्ट्रवादी-शिंदे गटातील वाद विकोपाला? “सुनील तटकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला”, भरत गोगावलेंचं मोठं विधान
Uday Samant On Shivsena Thackeray group
Uday Samant : “ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार अन् काँग्रेसचे ५ आमदार…”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “उद्या पहिला ट्रेलर…”
sanjay raut
Sanjay Raut : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी संजय राऊत यांची प्रतिक्रिया, “राजकीय फायद्यासाठी पोलिसांचे बळी…”

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महाविकास आघाडीने अद्याप कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही. काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) हे दोन पक्ष महाविकास आघाडीत एकत्र असले तरी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत वेगवेगळे लढतील असं बोललं जात आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे. काँग्रेच्या काही नेत्यांनी मुंबई महापालिकेबाबत स्वबळाचा नारा दिला आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेवेळी त्यांना याबद्दल पुन्हा एकदा विचारण्यात आलं.

हे ही वाचा >> “ना कोचिंग, ना लाखोंचा खर्च”, यूपीएससीत देशात दुसरी आलेल्या गरिमाने सांगितला यशाचा मंत्र

काँग्रेस मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहे का? असा प्रश्न नाना पटोले यांना विचारण्यात आला. यावर पटोले म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल आम्ही आधीच सांगितलं आहे. जिल्हा परिषद असो, पंचायत समितीची निवडणूक असो, महानगरपालिकेची निवडणूक असो अथवा नगरपालिकेची, जिथे जिथे जशी परिस्थिती असेल, तिथल्या स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल.

Story img Loader