शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार भाजपाच्या लिखित अजेंड्यावर काम करत आहेत. त्यांच्या तोंडी वाक्य टाकली जातात. उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांविरोधात बोलायचं असेल, तर लिहून दिलं जातं, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, “भाजपा लिहून देते, तसं अजित पवारांना बोलावं लागणार. शरद पवार सांगतात, ‘ईडीमुळे हे लोक सरकारबरोबर गेले आहेत.’ हे बोलले नाहीतर, ईडी आपल्यावर कारवाई करेल. म्हणून भाजपाने लिहून दिल्यानुसार अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना बोलावं लागते.”

Karnataka BJP leadership feud intensifies with anti-Yediyurappa camp proposing a new name for state unit chief.
“…तर कर्नाटकात दहा जागाही मिळणार नाहीत”, कर्नाटक भाजपामध्ये पेटला अंतर्गत वाद; प्रदेशाध्यक्षपदासाठी रस्सीखेच
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
ajit pawar said cm listens to his daughter who has her 10th exam
एकुलती एक असल्याने मुख्यमंत्र्यांना मुलीचे ऐकावे लागते, अजित पवार
Image Of Ajit Pawa
“महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”, हातात AK47 घेत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
pressure politics Ajit Pawar backing Dhananjay Munde NCP Beed walmik karad
अजित पवार हे धनंजय मुंडे यांना पाठिशी का घालत आहेत ?
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती

हेही वाचा : “आता त्यांचं तोंड उघडत नाही”, अजित पवारांचा उल्लेख करत गुलाबराव पाटलांचा राष्ट्रवादी काँग्रेसला टोला

“काँग्रेसमधून कोणीही बाहेर पडणार नाही”

काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. अजूनही काही लोक प्रवेश करतील, असं सांगितलं जात आहे. या प्रश्नावर नाना पटोले यांनी म्हटलं, “लहान कार्यकर्त्यांचा हा प्रश्न होता. मुंबई विभागीय अध्यक्षांबरोबर माझी चर्चा झाली नाही. काँग्रेसमधून लोक बाहेर जातात, ही भाजपाकडून अफवा पसरवली जाते. असं काहीही होणार नाही.”

हेही वाचा : “मी राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे”, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं; शरद पवारांना थेट आव्हान?

“देशात काँग्रेसशिवाय पर्याय नाही”

“दिल्ली-द्वारका महामार्गासाठी १८ हजार कोटींऐवजी फक्त २५० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे. देशातील अनेक महामार्गांची कामे झाले असून, त्याच किती मोठा भ्रष्टाचार झाला असेल? त्यामुळे सतत काँग्रेसवर टीका केली जाते. पण, जेवढी टीका करतील, तेवढा फायदा काँग्रेसला होणार आहे. देशात काँग्रेसशिवाय पर्याय नसल्याचं लोकांना कळलं आहे,” असं नाना पटोले यांनी म्हटलं.

Story img Loader