Nana Patole on Narendra Modi apology over Chhatrapati Shivaji Maharaj Statue collapsed : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आठ महिन्यांपूर्वी लोकार्पण केलेला पुतळा कोसळल्यानंतर राज्य सरकारवर या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार केल्याचे आरोप होत आहेत. या घटनेवरून विरोधक आक्रमक झालेले असतानाच घटनेच्या चार दिवसांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी जाहीर माफी मागितली आहे. नरेंद्र मोदी आज (३० ऑगस्ट) महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. दुपारी त्यांनी पालघर येथील वाढवण बंदराचे भूमिपूजन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी सिंधुदुर्ग येथील घटनेवर प्रतिक्रिया दिली. तसेच घडलेल्या दुर्घटनेबद्दल सर्व शिवभक्तांची जाहीर माफी देखील मागितली.

मोदींच्या माफीनंतर विरोधक राज्य सरकारच्या माफीची व मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माफी मागण्याची गरज का पडली? कारण त्यांनी चूक केली आहे आणि मोदींनी त्यांची चूक आता मान्य केली आहे. मोदींसह सत्ताधाऱ्यांनी चूक मान्य केली असेल तर त्यांनी काही गोष्टी तपासून बघायला पाहिजे होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला, त्या स्मारकाचा पाया व्यवस्थित होता का? चबुतरा व्यवस्थित होता का? मूर्ती मजबूत होती की नाही? या पुतळ्याला राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाने प्रमाणपत्र दिलं होतं का? पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी या गोष्टी तपासायला पाहिजे होत्या. त्यांच्या विभागाने देखील या गोष्टींची तपासणी करायला पाहिजे होती”.

Ravindr Dhangkar on Shiv sena :
Ravindr Dhangkar : माजी आमदार रविंद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार? स्पष्टीकरण देत म्हणाले, “मी काँग्रेस पक्षात…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare
Bharatshet Gogawale : पालकमंत्रिपदाचा वाद विकोपाला? “…तर मंत्रिपदाचा राजीनामा देतो”, भरत गोगावलेंचं सुनील तटकरेंना खुलं आव्हान
DCM Eknath Shinde On Guardian Minister
Eknath Shinde : पालकमंत्रिपदाच्या वाटपानंतर महायुतीत वाद? एकनाथ शिंदे म्हणाले, “मुख्यमंत्री दावोसवरून आल्यानंतर आम्ही…”
Uday Samant on Eknath Shinde
Sanjay Raut: “एकनाथ शिंदे आता देवेंद्र फडणवीसांना नकोसे, लवकरच मोदींना…”, संजय राऊत यांचा दावा
Sunil Tatkare On Raigad Guardian Minister
Sunil Tatkare : रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय स्थगित केल्यानंतर सुनील तटकरेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “मुख्यमंत्री आल्यानंतर…”
Why did Chief Minister Devendra Fadnavis immediately take note of Eknath Shindes displeasure
एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची मुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्काळ दखल कशामुळे घेतली ?
Gulabrao Pati
पालकमंत्रिपदांचं वाटप होताच महायुतीत वाद? शिंदेंचे मंत्री नाराज, भुसे-गोगावलेंसाठी गुलाबराव पाटील मैदानात; नेमकं काय म्हणाले?

हे ही वाचा >> Narendra Modi : “प्रायश्चित्त अटळ आहे, भ्रष्टाचाराला महाराजांनी…”, पंतप्रधान मोदींच्या माफीनंतर शरद पवार गटाचा टोला

पेशव्यांनी महाराजांचा अपमान केला : नाना पटोले

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “पेशव्यांच्या काळातही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला जात होता आणि आता शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या पेशव्यांनी सुद्धा पुन्हा एकदा महाराजांचा अपमान केला आहे. त्यामुळे माफीने हा प्रश्न सुटणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार या लोकांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेस पोहोचवली आहेत. त्यामुळे या लोकांनी सत्तेतून बाहेर व्हावं, नाहीतर राज्यातील जनता त्यांना सत्तेतून बाहेर खेचल्याशिवाय शांत बसणार नाही”.

Story img Loader