राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानामुळे चर्चेला उधाण आलं आहे. काँग्रेसमध्ये कोणी राहण्यास तयार नाही. अख्खा काँग्रेस पक्ष हळूहळू आपल्या पाठिशी येतोय. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं होते. या वक्तव्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तोडाफोडीचे राजकारण देवेंद्र फडणवीसांनी थांबवावे, असे आवाहन पटोलेंनी केलं.

‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना नाना पटोले म्हणाले, “केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘डबल इंजिन’चे सरकार असल्याचं सांगतात. मग, राज्यातील शेतकरी आत्महत्या का करतोय? हे सुद्धा सांगावे. गेल्या एक महिन्यांपासून शेतकऱ्यांना मदत देण्याचे आश्वासन दिले जाते. पण, फक्त घोषणांचा पाऊस पाडण्यात येत आहे.”

pune Kalyani group marathi news
मुखत्यारनाम्यासंबंधी आरोप निराधार; कल्याणी समूहाचे स्पष्टीकरण, कायदेशीर मार्गाने उत्तर देण्याचेही प्रतिपादन
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Anyone embezzling in Anand Dighe's ashram should be thoroughly investigated
आनंद दिघेंच्या आश्रमात ज्यांनी चुकीचे कृत्य केले त्यांना……शिंदे सेनेच्या मंत्र्याने थेटच सांगितले…
emand for an inquiry into pm narendra mondis allegations against Rahul Gandhi was rejected
अदानी-अंबानींनी टेम्पो भरून पैसे पाठवल्याचे वक्तव्य, पंतप्रधान मोंदींच्या राहुल गांधीवरील आरोपांच्या चौकशीची मागणी फेटाळली
home minister amit shah slams rahul gandhi over reservation remark in america
राहुल यांच्या वक्तव्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
Controversy over the initials Rama written on the body of a goat
बकऱ्याच्या अंगावर लिहिलेल्या राम आद्याक्षरावरून वाद; न्यायालयात नेमके काय घडले?
Two bullets entered Vanraj Andekar body according to the postmortem report
वनराज आंदेकरांच्या शरीरात दोन गोळ्या शिरल्या; आरोपींकडून  तब्बल २४ वार, शवविच्छेदन अहवालातून माहिती समोर 
pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…

हेही वाचा : दिल्लीतील पवारांच्या बैठकीनंतर राहुल गांधी – उद्धव ठाकरे भेटणार का? संजय राऊत म्हणाले…

“नैसर्गिक आपत्तीचे संकट शेतकऱ्यांवर आले आहे. मात्र, शेतकऱ्यांचा कापूस अद्यापही खरेदी करण्यात आला नाही. हरभरा, मका, तूर शेतकऱ्यांच्या घरात पडलेले आहेत. बेरोजगार आणि गरिबांचे बेहाल सुरू असून, महागाई वाढली आहे. अशा परिस्थितीत फोडाफोडीचे राजकारण करण्यापेक्षा सत्तेचा लोकांना फायदा मिळवून द्या. फोडाफोडीच्या राजकारणात त्यांना काहीच भेटणार नाही,” अशी टीका नाना पटोलेंनी केली आहे.

हेही वाचा : “मविआची ‘वज्रमूठ’ तडा गेलेली”, देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका; आदित्य ठाकरेंनीही दिलं प्रत्युत्तर, म्हणाले …

महाविकास आघाडीचे तीन तोंड तीन वेगळ्या दिशेला आहे. त्यांचा एक भोंगा सकाळी ९ वाजता वाजतो. दुसरा भोंगा त्याच्या विरुद्ध दुपारी १२ वाजता वाजतो. तर तिसरा भोंगा संध्याकाळी वेगळंच काहीतरी बोलतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. या बद्दल विचारल्यावर नाना पटोलेंनी सांगितले, “फडणवीसांना विरोधकांवर टीका करण्याचा अधिकार आहे. पण, त्यांच्या हातातील सत्तेचा उपयोग स्वत: आणि बगलबच्चांसाठी चाललेला आहे. मंत्रालयात तिजोरी लुटली जात आहे, हे फडणवीसांनी पाहावे. तसेच, तोडाफोडीचे राजकारण देवेंद्र फडणवीसांनी थांबवावे,” असं आवाहन नाना पटोलेंनी केले आहे.