अजित पवार आणि धनंजय मुंडे यांनी सरड्यासारखा रंग बदलला आहे. सत्तेत गेलेले लोक वास्तव लपवत आहेत. सरड्यासारखं होऊ नका अशी आमची त्यांना सूचना आहे असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजित पवार आणि धनंजय मुंडेंवर टीका केली आहे. सरडा हा रंग बदलणारा प्राणी आहे. मी त्यांना (अजित पवार आणि धनंजय मुंडे) यांना सरडा म्हणण्याचं कारणच हे आहे की सत्तेत गेल्यानंतर ते आता वेगळंच वागत आहेत असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

इगतपुरीत एका गरोदर मातेचा महिलेचा मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद विधानसभेत उमटले. नाना पटोलेंनी हा मुद्दा जोरकसपणे उपस्थित करत सरकारला धारेवर धरलं. भाजपाला सत्तेचा माज आला आहे पण आता लोक हा माज उतरवतील असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे. भाजपाकडून मूठभर लोकांना सोयी सुविधा दिल्या जात आहेत असाही आरोप नाना पटोलेंनी केला.

ajit pawar visit at rajkot fort malvan
Ajit Pawar : “शिवरायांच्या नावाला साजेसं स्मारक उभारणार”; राजकोट किल्ल्याच्या पाहणीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया; ठाकरे-राणे वादावर म्हणाले…
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
sanjay raut criticized devendra fadnavis
Sanjay Raut : “हा महाराष्ट्राच्या गृहखात्यावर थुंकण्याचा प्रकार”; राजकोट किल्ल्यावरील राड्यावरून संजय राऊतांचं टीकास्र; म्हणाले, “भाजपाच्या गुंडांनी काल…”
Vasai, child abuse, stepmother, Stepmother Brutally Assaults Children, Waliv Police Station,
वसई : सावत्र आईकडून दोन चिमुकल्यांचा अमानुष छळ; गुप्तांगाला गरम चाकूने चटके, अमानुष मारहाण
ravi rana clarification on ladki bahin
Ravi Rana : विरोधकांनी टीकेची झोड उठवताच ‘त्या’ विधानावर आमदार रवी राणा यांचे स्पष्टीकरण; म्हणाले, “मी जे बोललो…”
Maharashtra Navnirman Sena workers attacked Uddhav Thackeray convoy in Thane
ठाण्यात उद्धव यांच्यावरील मनसे हल्ल्याला कोणाचे छुपे समर्थन?
raid, gambling, Lonavala, Lonavala gambling den,
लोणावळ्यात जुगार अड्ड्यावर छापा; पोलिसांकडून १४ जणांवर गुन्हा
vandalization, vehicles, Yerawada police,
पुणे : वाहने फोडली तिथेच पोलिसांनी काढली धिंड, येरवडा पोलिसांची कारवाई

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलच्या मुद्द्यावर भाजपावर टीका केली. त्याबाबत प्रश्न विचारला असता नाना पटोले यांनी राज ठाकरेंनी मांडलेला मुद्दा योग्यच आहे असं म्हटलं आहे. तसंच भाजपावाले टोलमुक्त महाराष्ट्र ओरडत होते त्याचं काय झालं? भाजपाकडून समृद्धी महामार्गावर निर्दोषांची हत्या केली जाते आहे असाही गंभीर आरोप नाना पटोलेंनी केला. एवढंच नाही तर मणिपूर जळतं आहे, तिथला एक अत्यंत भयंकर व्हिडीओ समोर आला आहे तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर काहीही बोलत नाहीत असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

महाराष्ट्राचं सरकार घोषणेचा पाऊस पाडणारं सरकार आहे. या सरकारला आमचं आव्हान आहे की घोषणा करुन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नका. शेतकऱ्यांच्या आत्महत्येला भाजपा सरकार जबाबदार आहे असाही आरोप नाना पटोलेंनी केला.