राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आणि कागलचे विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांच्या मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाने जानेवारी महिन्यात छापेमारी केली होती. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा एकदा मुश्रीफांच्या घरांवर ईडीने धाडी टाकल्या. मुश्रीफ यांच्या पुणे आणि कोल्हापुरातील मालमत्तेची इडीच्या पथकाकडून चौकशी करण्यात आली. मुश्रीफ यांच्या निकटवर्तीयांची देखील ‘ईडी’च्या पथकाकडून शुक्रवारी चौकशी करण्यात आली. ईडीच्या या कारवाईनंतर महाराष्ट्राचं राजकारण तापू लागलं आहे.

एकीकडे मुश्रीफ समर्थक रस्त्यावर उतरले आहेत, तर दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष मुश्रीफांच्या सोबत उभे आहेत. या कारवाईवरून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते भाजपावर टीका करू लागले आहेत. मुश्रीफ यांच्या घरांवरील ईडीच्या छापेमारीबद्दल विचारले असता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, “भाजपा हे सगळं जाणीवपूर्वक करत आहे. त्यांचा विरोधकांना घाबरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपण अनिल देशमुखांचं प्रकरण नुकतंच पाहिलं आहे. परमवीर सिंहांनी जे काही आरोप केले त्याची काही चौकशी झाली नाही.”

NCP Sharad Pawar group leader Jitendra Awad allegation regarding the project contractor thane
प्रकल्प कंत्राटदार आधीच ठरतो मग, कंत्राट काढले जाते; राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे नेते जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Navi Mumbai, Naina area, PM Narendra Modi,
नवी मुंबई : नैना क्षेत्रातील २५०० कोटी रुपयांच्या कामाचे पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन
In Badlapur case accused Akshay Shinde Thane alleged encounter
चकमकी अखेर पोलिसांवरच का शेकतात?
Girls, hotel room, meet friend, High Court,
मुलींनो, मित्राला भेटायला थेट हॉटेलच्या खोलीत जाऊ नका.. उच्च न्यायालयाचा सल्ला!
Sexual assault journalist Kalyan,
कल्याणमध्ये महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचार
Due to hunger strike of sugarcane growers problems of Congress leaders siddharam mhetre have increased
ऊस उत्पादकांच्या उपोषणामुळे काँग्रेस नेते म्हेत्रेंच्या अडचणीत वाढ
cyber crime, Courier Scam, cyber criminals,
सायबर गुन्हेगारांचा फसवणुकीचा नवा प्रकार.. काय आहे ‘कुरिअर स्कॅम’?

पटोले म्हणाले की, “अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांचा आरोप केला होता. परंतु त्यांना या प्रकरणात कोणतेही पुरावे सापडले नाहीत. एका निरपराध माणसाला दीड वर्ष तुरुंगात राहावं लागलं. त्यांच्यावर जे काही आरोप झाले त्यापैकी एकाही प्रकरणात ईडी किंवा सीबीआयकडून कारवाई झालेली नाही. परंतु अशा कारवाईनंतर जे लोक भाजपामध्ये गेले ते स्वच्छ झाले. यांच्याकडे (भाजपा) गेलेल्या लोाकंची चौकशी का झाली नाही? एबीपी माझाशी बोलताना पटोले यांनी सवाल केला की, “भाजपात काय सगळे दुधाने धुतलेले लोक आहेत का?”

हे ही वाचा >> “गर्भवती सुनेला १५ तास बसवून ठेवलं”, ईडीच्या धाडीवर लालू यादव संतापले, म्हणाले, “नतमस्तक…”

नागपूर भाजपच्या नेत्यांकडे पैसे आले कुठून? : पटोलेंचा सवाल

पटोले म्हणाले की, “नागपुरात भाजपचे अनेक नेते आहेत ज्यांच्याकडे साधी स्कूटर नव्हती, त्यांच्याकडे आता हेलिकॉप्टर आहे. या नेत्यांनी आता मोठमोठे बंगले बांधले आहेत, फार्महाऊस बांधले आहेत. हे पैसे आणले कुठून? याची चौकशी होणार आहे का?”