पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ( ८ ऑगस्ट ) महाराष्ट्रातील ‘एनडीए’च्या खासदारांना मार्गदर्शन केलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं. काँग्रेसमधील घराणेशाहीच्या राजकारणामुळे शरद पवारांना पंतप्रधान पदाची संधी मिळाली नाही, असं विधान मोदींनी केलं. या विधानानंतर राज्यासह देशात राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही यावर भाष्य केलं आहे.

नरेंद्र मोदी काय म्हणाले?

“काँग्रेसमधील घराणेशाहीच्या राजकारणामुळे शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही. तसेच, शरद पवार आणि काँग्रेसने अनेक राजकीय क्षमता असलेल्या नेत्यांना डालवण्यांचं काम केलं,” असं मोदींनी म्हटलं.

kapil sharma
कपिल शर्मा यशस्वी झाल्यानंतर अहंकारी झाल्याच्या दाव्यांवर सहकलाकाराचे वक्तव्य; म्हणाला, “५ टक्केसुद्धा…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
ajit pawar said cm listens to his daughter who has her 10th exam
एकुलती एक असल्याने मुख्यमंत्र्यांना मुलीचे ऐकावे लागते, अजित पवार
Image Of Ajit Pawa
“महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”, हातात AK47 घेत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी
What Rahul Solapurkar Said?
Rahul Solapurkar : राहुल सोलापूरकरांनी भांडारकर संस्थेचं विश्वस्तपद सोडलं, शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्यावरील माफीनाम्यानंतर राजीनामा
controversial referee decision at maharashtra kesari event
अन्वयार्थ : कुस्तीच चितपट होऊ नये यासाठी…!
mahant namdevshastri latest news in marathi
“नामदेव शास्त्रींनी माफी मागावी अन्यथा…”, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा इशारा
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”

हेही वाचा : “…तर मुख्यमंत्रीपदाची खुर्चीही हलू दिली नसती”, पंतप्रधानांच्या ‘त्या’ वक्तव्यावर ठाकरे गटातील नेत्याचं विधान

याबद्दल नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी नाना पटोले यांना प्रश्न विचारला. त्यावर नाना पटोले म्हणाले, “एवढी काळजी आहे, तर मोदींनी शरद पवारांना पंतप्रधान बनवावे.”

भाजपाने नव्हे तर शिवसेनेनं युती तोडली, असेही मोदींनी म्हटलं. त्याबद्दल विचारल्यावर नाना पटोले यांनी सांगितलं, “मोदींनी मणिपूर, बेरोजगारी, शेतकरी, गरीबी, महागाईबद्दल बोललं पाहिजे. गेली नऊ वर्षे झाले देशातील जनता राजकीय भाषण ऐकत आहे. जनता ‘मन की बात’ ऐकण्यासही तयार नाहीत. मणिपूर पेटत असताना पंतप्रधान मौन ठेवत असतील, तर यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणती नाही.”

Story img Loader