पाच महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आणि त्यात झालेल्या राजकीय पडझडीत एक नाव सातत्याने चर्चेत राहिले, ते म्हणजे आसाममधील गुवाहाटी होय. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व त्यांच्या गटातील मंत्री आणि आमदार पुन्हा गुवाहाटीला जाणार आहेत. ही गुवाहाटीवारी आसाममधील प्रसिद्ध कामाख्या देवीचे दर्शन घेण्यासाठी आहे. यावरून शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली होती.

शिंदे गटावर हल्लाबोल करताना संजय राऊत म्हणाले की, “५० रेडे परत गुवाहाटीला चालले आहेत. जाऊन दर्शन घेऊन या. पण, सुदर्शन चक्र आमच्याकडे आहे. उद्धव ठाकरेंच्या हातात हे सुदर्शन चक्र फिरत आहे. त्याने या ५० रेड्यांचा राजकीय दृष्ट्या नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही,” अशा शब्दांचा संजय राऊतांनी समाचार घेतला होता.

after controvrcial remark on rahul gandhi bonde said in sense my statement makes mother angry with child
नागपूर : राहुल गांधींवर टीका करणारे भाजप खासदार अनिल बोंडे म्हणाले ” माझे वक्तव्य आई मुलाला रागावते त्या अर्थाने “
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
after facing lots of difficulties two come together and become one forever
वर्धा : तो अनाथ, ती दिव्यांग ! प्रेमाच्या आणाभाका आणि कुटुंबाचा विरोध झुगारून शुभमंगल.
docudrama Mai, documentaries, documentary,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : आकाशपाळण्यातील धाडस..
RSS Mohan Bhagwat, pune,
देव झालो, असे स्वत: म्हणू नये; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन
Sanjay Manjrekar brually trolled by fans
Duleep Trophy 2024 : रोहित-विराट, बुमराहच्या विश्रांतीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या माजी खेळाडूला चाहत्यांचे चोख प्रत्युत्तर; म्हणाले…
Congress is involve in dispute between two factions of BJP Nagpur news
भाजपच्या दोन गटातील वादात काँग्रेसची उडी, काय आहे प्रकार
Blind youth at the Dahi Handi festival in the lane of Ideal in Dadar Mumbai news
दृष्टीहीन तरुण-तरुणींचे मानवी मनोरे ठरले लक्षवेधी; नयन फाऊंडेशन गोविंदा पथकाची शानदार सलामी

हेही वाचा : “अनायसे फोन आलाच होता तर…” ; चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना लगावला टोला!

याला आता शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. “आवाजही न फुटणाऱ्या बावळट पेंग्विनपेक्षा रेडे परवडले. रेड्यांनी शिंगे उगारली की बिळात जाऊन लपू नका. लहान मुले खेळण्यातील सुदर्शन चक्र फिरवतात, तसेच त्यांच्या हातात आहे. एक फुंकर मारली की ते उडून जाईल,” असा टोलाही नरेश मस्के यांनी लगावला आहे.