मुंबई येथे १५ जून पासून तीन दिवसीय आयोजन

नेतृत्व, लोकशाही, प्रशासन आणि शांतता प्रिय समाज निर्माण करण्यासाठी देशातील चार हजार तीनशे आमदार राष्ट्रीय विधायक संमेलनासाठी एकत्रित येणार असल्याची माहिती विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत दिली

देशातील सर्व आमदार एकाच व्यासपीठावर विचार विनिमय करणार आहेत .पुणे येथील एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्मेंट तर्फे आयोजित राष्ट्रीय विधायक संमेलन, भारत हे मुंबई येथील बीकेसी जिओ सेक्टरमध्ये १५ ते १७ जून दरम्यान होणार आहे. देशातील सर्व विधानसभा विधान परिषदेचे अध्यक्ष व सभापती यांच्या सहकार्याने हे संमेलन होत असल्याची माहितीही रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.यावेळी एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील भक्ती जाधव संगीता साळुंखे रवींद्र पाटील विक्रम सिंह जाधव आदी उपस्थित होते .

girish kuber loksatta editor stated intellectuals are essential for social progress and ideological depth
सातारा : सामाजिक प्रगती आणि वैचारिक प्रगल्भतेसाठी बुद्धिवंतांचे असणे गरजेचे, ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांचे प्रतिपादन
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
devendra fadnavis interview in loksatta Varshvedh event
महाराष्ट्रात युतीचे राजकारण आणखी काही काळ चालेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका
the high court upheld states decision rejecting bjp mp gopal shettys petition
बहुमजली झोपड्यांना झोपु योजनेचे लाभ न देण्याचे सरकारचे धोरण योग्यच उच्च न्यायालयाचा निर्वाळा, धोरणाविरोधातील भाजप खासदार गोपाळ शेट्टींची याचिका फेटाळली
Ganpat Gaikwad wrote letter to Kalyan Dombivli Municipal Commissioner with jail approval
गणपत गायकवाड यांचे तुरुंगातून विकास कामांसाठी कडोंमपा आयुक्तांना पत्र
congress government analysis Telangana caste Survey
अन्वयार्थ : जनगणना कधी?
Maharashtra FM Ajit Pawar on state budget
राज्याच्या अर्थसंकल्पात ‘लाडक्या बहिणी’, सामान्य नागरिक केंद्रबिंदू; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा
There was no competition for post of guardian minister of Satara says Shambhuraj Desai
साताऱ्याच्या पालकमंत्रिपदासाठी स्पर्धा नव्हतीच- शंभूराज देसाई

रामराजे म्हणाले, राष्ट्रनिर्माण ,राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय सर्वांगीण शाश्वत विकास या मध्यवर्ती विचार त्रिसूत्रीचा प्रमुख उद्देश ठेवून हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे .या संमेलनाचे उद्घाटन १६जून रोजी आहे १७ जून रोजी समारोप होईल .लोकसभेच्या माजी सभापती सुमित्र महाजन, डॉ मीरा कुमार, शिवराज पाटील चाकूरकर, मनोहर जोशी, तसेच लोकसभेचे सभापती ओम बिर्ला हे या संमेलनाचे मार्गदर्शक व संयोजक आहेत. एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्मेंट चे संस्थापक अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या विचार चिंतनामधून राष्ट्रीय विधायक संमेलन भारत ही संकल्पना साकारली आहे. ते या संमेलनाचे प्रमुख संयोजक समन्वयक आहेत .या संमेलनात सार्वजनिक जीवनातील तणाव, व्यवस्थापन शाश्वत विकासाची साधने आणि प्रभाव कल्याणकारी योजना शेवटच्या व्यक्तीचे उत्थान आर्थिक कल्याणासाठी तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि कौतुकास्पद विधान पद्धती सामाजिक कल्याणासाठी सहयोग नोकरशहा आणि आमदार या विषयावर चर्चा होणार आहे.

साताऱ्याच्या लोकसभा निवडणुकीत रामराजे नाईक निंबाळकर यांनी उमेदवारी करावी अशी अनेकांची इच्छा आहे आणि तशी चर्चाही सध्या सर्वत्र सुरू असल्याचे त्याबाबत विचारले असता व आपण सातारा की माढा कुठून उभे राहणार असेही विचारले असता रामराजे म्हणाले या मागणीचा योग्य वेळी योग्य मान राखला जाईल.

Story img Loader