Sunil Tatkare on Ajit Pawar : विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून सर्व पक्षाच्या नेत्यांचे महाराष्ट्रात सध्या दौरे सुरु आहेत. या दौऱ्याच्या माध्यमातून सभा, मेळावे, आढावा बैठका घेत आगामी निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. असं असतानाच आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीबाबत मोठं विधान केलं. “मी ७-८ वेळा निवडणूक लढलो, आता मला रस राहिला नाही. तसेच जय पवार यांच्या उमेदवारीबाबत पक्षाचे संसदीय मंडळ निर्णय घेईल”, असं अजित पवार यांनी म्हटलं. त्यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजित पवारांच्या त्या विधानाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. “अजित पवारांनी ज्या भावना व्यक्त केल्या, त्या भावना त्यांनी नाही तर त्यांना प्रश्न विचारला गेल्यानंतर व्यक्त केल्या आहेत. मी त्यांच्याशी याबाबत चर्चा करेन”, असं सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी म्हटलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा