नाट्यमय घडामोडींनंतर अंधेरी मतदारसंघातील पोटनिवडणुकीतून भाजपाने अखेर माघार घेतली. यामुळे शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपाने राज्याची राजकीय परंपरा कायम ठेवत माघार घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असून टीका-टिप्पणी होत आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना चांगल्या निर्णयाला चांगलं म्हटलं पाहिजे असा सल्ला दिला आहे.

काय म्हणाले अजित पवार?

“काल एक चांगला निर्णय झाला. रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरीमधील पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना उद्धव ठाकरेंनी उमेदवारी दिली होती. शरद पवार यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आवाहन केलं होतं. तसंच राज ठाकरेंनी पत्र लिहिलं होतं. भाजपाने त्यासंबंधी सकारात्म भूमिका घेतली याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. कारण महाराष्ट्रात जर असे पायंडे पडले तर ते चांगलं आहे,” असं अजित पवारांनी सांगितलं.

What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
Dhananjay Munde on Namdev Shastri Maharaj
Dhananjay Munde : महंत नामदेव शास्त्री महाराजांनी पाठिंबा दर्शवल्यानंतर धनंजय मुंंडेंनी व्यक्त केल्या भावना; म्हणाले, “इतकी मोठी शक्ती…”
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
Pimpri , fire, worker house, cash burnt, loksatta news,
पिंपरी : कामगाराच्या घराला भीषण आग, पाच लाखांची रोकड जळून खाक
auto driver who rushed saif ali khan refused to disclose amount he got
जखमी सैफला रिक्षातून रुग्णालयात नेणाऱ्या चालकाला किती बक्षीस मिळालं? म्हणाला, “माझ्यासाठी तो…”

अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपाने माघार घेतल्यानंतर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “इतका आडमुठेपणा…”

पुढे ते म्हणाले की “गोपीनाथ मुंडे यांचं निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने सामंजस्याची भूमिका घेतली होती. संपूर्ण महाराष्ट्राने ते पाहिलं होतं. यानिमित्ताने दिवाळीच्या तोंडावर चांगलं वातावरण निर्माण झालं आहे”.

“चांगल्याला चांगलं म्हणा”

“पण यावर काहीजण टीका करत आहेत. आता चांगलं झाल्यावर कशाला टीका करायची. शब्दाने शब्द वाढत जातो. चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे असं माझं सर्वच राजकीय पक्षांना आवाहन आहे. वेगळा अर्थ काढून उगाच कोणाला तरी डिवचण्याचा, उचकवण्याचा प्रयत्न करु नये हे माझं स्पष्ट मत आहे,” असंही अजित पवारांनी सांगितलं.

अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी, सोमवारी भाजपचे मुरजी पटेल यांनी माघार घेतली. या पोटनिवडणुकीत १४ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. माघारीनंतर लटके यांच्यासह सात उमेदवार रिंगणात असल्याने ३ नोव्हेंबरला प्रत्यक्ष मतदान होईल.

मोठी बातमी! अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपाची माघार, ऋतुजा लटकेंचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा

दिवंगत लोकप्रतिनिधीच्या कुटुंबियांतील कोणी लढत असल्यास पोटनिवडणूक बिनविरोध करून राज्यातील उज्ज्वल परंपरेचे पालन करावे, असे आवाहन मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केले होते. तसेच ही पोटनिवडणूक बिनविरोध करावी, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही केली होती. ‘बाळासाहेबांची शिवसेना’ गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी केली होती. राज ठाकरे यांच्या सूचनेबाबत गांभीर्याने विचार करण्यात येईल, असे नमूद करत पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे सुतोवाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.

Story img Loader