महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अस्तित्वात आलं आहे. पण अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला नाही. असं असलं तरी शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीकडून घोषित केलेल्या अनेक योजनांचा निधी रोखला आहे किंवा स्थगिती दिली आहे.

यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. सरकारमध्ये आला आहात आता राज्याच्या समस्या तरी सोडवा, असा खोचक सल्लाही अजित पवारांनी दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

Deputy Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray jejuri pune news
ज्यांनी विचार सोडले, त्यांना जनतेने थारा दिला नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Shiv Sena Shinde group strategizes for party growth before upcoming Pune Municipal Corporation elections
पुण्यावर शिंदे गटाचा ‘आवाज’ वाढणार
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
dcm eknath shinde slams sharad pawar for his statement
विरोधकांच्या टीकेला कामातून उत्तर; एकनाथ शिंदे यांचे शरद पवार यांच्यावर टीकास्त्र
Uday Samant On Shivsena Thackeray group
Uday Samant : “ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार अन् काँग्रेसचे ५ आमदार…”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “उद्या पहिला ट्रेलर…”
Saamana critiques Shiv Sena leadership on Balasaheb Thackeray’s birth anniversary, targeting the Shinde faction.
“शिवसेनारूपी कवचकुंडले मोडून ती तोतया शिंदेंच्या हाती सोपवली”, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिनी ठाकरे गटाची टीका

“मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं” या चंद्रकांत पाटलांच्या विधानावरून अजित पवारांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, “भूकंप-भूकंप करणाऱ्यांनी राज्य ताब्यात घेतलंय ना, ते आता व्यवस्थित चालवा. ज्या समस्या आहेत, त्या सोडवा. एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन आणि एवढं बहुमत मिळूनही समाधान झालं नाही का? अजून किती मोठी भूक आहे, ते तरी एकदा कळू द्या.”

हेही वाचा- गुलाबराव पाटलांची उद्धव ठाकरेंविरोधात नाराजी, अखेर मनातील खदखद आली बाहेर

“सरकारमध्ये येण्यापुरती भूक होती, ती छाताडावर की कुठेतरी दगड, धोंडा ठेऊन भागवली आहे ना? बरं झालं मोठा दगड ठेवला नाही, नाहीतर जीवच गेला असता, म्हणजे झेपेल असाच दगड ठेवला” असा टोला अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.

हेही वाचा- बंडखोर आमदार गुलाबराव पाटलांची आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका, म्हणाले, “गेल्या अडीच वर्षात कधीही…”

दरम्यान, दैनंदिन वापरातील खाद्यपदार्थांवर लावलेल्या जीएसटीवरून अजित पवार यांनी केंद्र सरकारवरही टीका केली आहे. सध्या देशात महागाई वाढत असताना, दूध, दही यांसारख्या दूग्धजन्य पदार्थांवर जीएसटी लावून गरीब आणि मध्यमवर्गीय जनतेची चेष्टा करू नका, असंही अजित पवार म्हणाले.

Story img Loader